Hinjawadi: हिंजवडीत एकामागोमाग उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी (१० जुलै) महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात हिंजवडीसह आसपासची गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या महिनाभरापासून अधिक काळ हिंजवडी नागरिक आणि येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे लाखो कर्मचारी विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कमी वेळात झालेल्या जोरदार पावसामुळे हिंजवडीतील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आल्याचे यंदा वारंवार पाहायला मिळाले. मेट्रोच्या कामामुळे येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, त्याच्या दुरुस्तीकडे कोणत्याच यंत्रणांचे लक्ष नाही. या संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा काम करीत असून, त्यांच्यात समन्वय नसल्याने येथील समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे.
संजय शिरसाट अडचणीत? विट्स हॉटेल प्रकरणी सभागृहात गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
या समस्येविरोधात प्रथमच नागरिकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. हिंजवडीतील प्रश्न सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तर्फे (पीएमआरडीए) पावले उचलली जात आहेत. मात्र, काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनीच लक्ष घालण्याची गळ आमदार-खासदारांकडून घालण्यात येत होती.
School Closed: राज्यातील 5000 शाळा दोन दिवस राहणार बंद, शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन, काय कारण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकले असून, हिंजवडीचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंजवडीतील विविध समस्यांबाबत गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची बैठक होणार आहे. -महेश लांडगे, आमदार, भोसरी
या भागांचा विकास ग्रामपंचायतीच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणासाठी या गावांचा तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे अत्यावश्यक आहे. – शंकर जगताप, आमदार, चिंचवड

