• Fri. Mar 6th, 2026
    नव्या घराचं बांधकाम सुरु, भिंतींना पाणी देताना शॉक, ‘ते’ स्वप्न अधुरं सोडत अंतू कायमचे गेले

    Man Died By Electricity Shock: नव्या घराच्या बांधकामावेळी भिंतींना पाणी देताना विद्युत शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या नव्या घराचं स्वप्न ही व्यक्ती पाहत होतं, ते पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    खडकलाट: घराचं काम सुरु होतं. भिंती उभारल्या होत्या. त्या भिंतींना पाणी देत असताना विजेचा तीव्र झटका लागून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंतू उर्फ श्रेणिक मुरलीधर कुलकर्णी असं या ४२ वर्षीय व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे. गुरुवारी (१ मे) सकाळी ८ वाजताच्या सुमासार अंतु यांना विद्युत मोटारीचा श़ॉक लागला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आपलं घर बनवण्याचं स्वप्न अर्धवट सोडूनच अंतू कायमचे निघून गेल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

    याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेळगावातील खडकलाट या गावातील ग्रामदैवत मर्द गैबीपीर उरुस समिती, बेंदूर विजया दशमी सीमोल्लंघन, शर्यती आणि इतर ग्रामोत्सव समितीप्रमुख मुरलीधर दत्तात्रय कुलकर्णी आणि मुकुंदराव कुलकर्णी यांचे जुने कौलारू मातीचं घर होत. या घराच्या भिंतींना तडे गेल्याने त्या कधीही पडतील अशी स्थिती झाली होती. त्यामुळे या कुटुंबाने या भिंती पाडून नवं विटांचं घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम सुरु होते. यादरम्यान अंतू हे नेहमी बांधकाम सुरु असलेल्या भिंतींना पाणी टाकायचे.
    Jalgaon Crime: मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरांचं मातृत्व हरपलं
    नेहमीप्रमाणे, ते गुरूवारीही भिंतींना पाणी टाकायला गेले. मात्र, त्यांना हे माहितच नव्हतं की विद्युत मोटारीचे वायर या पाण्यात भिजल्या आहेत. नेमके ते पाणी टाकायला गेले आणि तेवढ्यात त्यांना या विद्युत मोटारीमुळे विजेचा जोरदार झटका लागला आणि ते जमिनीवर कोसळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे त्यांना निपाणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्यांना निपाणीला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    Belgaum News: नव्या घराचं बांधकाम सुरु, भिंतींना पाणी देताना शॉक, ‘ते’ स्वप्न अधुरं सोडत अंतू कायमचे गेले

    त्यंच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, बहीण आणि चुलते असं मोठं कुटुंब आहे. अंतू हे एकुलते एक असल्याने त्यांच्या मृत्यूने त्यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जो मुलगा त्यांचा वारसा पुढे नेणार होता, त्यांच्या म्हातारपणातील आधार होणार होता आता त्याच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आळी. त्यामुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत होती.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed