Man Died By Electricity Shock: नव्या घराच्या बांधकामावेळी भिंतींना पाणी देताना विद्युत शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या नव्या घराचं स्वप्न ही व्यक्ती पाहत होतं, ते पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेळगावातील खडकलाट या गावातील ग्रामदैवत मर्द गैबीपीर उरुस समिती, बेंदूर विजया दशमी सीमोल्लंघन, शर्यती आणि इतर ग्रामोत्सव समितीप्रमुख मुरलीधर दत्तात्रय कुलकर्णी आणि मुकुंदराव कुलकर्णी यांचे जुने कौलारू मातीचं घर होत. या घराच्या भिंतींना तडे गेल्याने त्या कधीही पडतील अशी स्थिती झाली होती. त्यामुळे या कुटुंबाने या भिंती पाडून नवं विटांचं घर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम सुरु होते. यादरम्यान अंतू हे नेहमी बांधकाम सुरु असलेल्या भिंतींना पाणी टाकायचे.
Jalgaon Crime: मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरांचं मातृत्व हरपलं
नेहमीप्रमाणे, ते गुरूवारीही भिंतींना पाणी टाकायला गेले. मात्र, त्यांना हे माहितच नव्हतं की विद्युत मोटारीचे वायर या पाण्यात भिजल्या आहेत. नेमके ते पाणी टाकायला गेले आणि तेवढ्यात त्यांना या विद्युत मोटारीमुळे विजेचा जोरदार झटका लागला आणि ते जमिनीवर कोसळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे त्यांना निपाणी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्यांना निपाणीला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Belgaum News: नव्या घराचं बांधकाम सुरु, भिंतींना पाणी देताना शॉक, ‘ते’ स्वप्न अधुरं सोडत अंतू कायमचे गेले
त्यंच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, बहीण आणि चुलते असं मोठं कुटुंब आहे. अंतू हे एकुलते एक असल्याने त्यांच्या मृत्यूने त्यांच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जो मुलगा त्यांचा वारसा पुढे नेणार होता, त्यांच्या म्हातारपणातील आधार होणार होता आता त्याच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ या कुटुंबावर आळी. त्यामुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत होती.

