संतोष देशमुख प्रकरणाने देशाला हादरवून टाकले होते. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असताना वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सोलापूरमधील मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडला कसलाही पॅनिक अटॅक आला नाही, तुरुंगात त्याचं नाटक सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी म्हणजे एक प्रकारचे दहशतवादीच आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूर मधील मराठा बांधवानी दिली आहे.