• Sun. Mar 15th, 2026

    Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट, अनुदान देण्याची मागणी

    Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट, अनुदान देण्याची मागणी

    Nashik Onion Price: नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

    onion 1600 (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गत आठवड्यात कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल झाली असून, राज्यातील एकूण कांदा आवकमध्ये नाशिकचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, कमी दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

    गत आठवड्यात कांद्याला किमान ८४० रुपये, तर कमाल १२५० रुपये दर मिळाला. एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा फटका कांद्याच्या प्रतवारीला बसत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची गुणवत्ता खराब होत आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानेही कांद्याचे नुकसान केले. परिणामी, शेतकरी आता कांद्याची प्रतवारी करण्यात गुंतले आहेत. चांगले बाजारभाव मिळण्याची वाट पाहत, प्रतवारी केलेला कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
    शुभमंगल ‘सावधान’! लग्नसोहळ्यातील जेवणातून विषबाधा; २८९ वऱ्हाडींची प्रकृती बिघडली, एका चिमुकल्याचा मृत्यू
    उन्हाळी कांद्याची साठवण

    उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने, हा कांदा चाळींमध्ये साठविला जातो. शेतकरी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून साठवतात आणि बाजारभाव वाढल्यानंतर तो विक्रीसाठी आणतात. एप्रिल-मे महिन्यांत साठविलेला कांदा जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये विक्रीसाठी बाजारात येतो. पावसाळ्यात कांद्याची आवक कमी झाल्याने या कालावधीत दरात वाढ होते. याच धोरणानुसार शेतकरी सध्या कांदा साठवणीवर लक्ष देत आहेत.
    लाकूड, कोळसा नकोच! बेकऱ्या, रेस्टॉरंट, भट्ट्यांमध्ये ९ जुलैनंतर वापर न करण्याचे ‘एमपीसीबी’चे निर्देश
    राजू शेट्टींकडून
    सरकारवर हल्लाबोल

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच लासलगाव बाजार समितीला भेट देऊन केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणावर टीका केली. दि. १ एप्रिलनंतर विकल्या गेलेल्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

    दृष्टिक्षेप
    गत आठवड्यात कांद्याला किमान ८०० रुपयेच दर
    कांद्याची आवक सुमारे दीड लाख क्विंटल
    एप्रिलमधील तीव्र उष्णतेचा कांद्याच्या प्रतवारीला फटका
    १ एप्रिलनंतर विकल्या गेलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये
    अनुदान देण्याची राजू शेट्टी यांची मागणी
    Eknath Shinde: हीच का उबाठाची देशभक्ती? सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थितीवरुन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल
    निर्यात धोरणाचा फटका

    कांदा दरातील चढ-उतार आणि निर्यातीतील अनिश्चित धोरण याचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. निर्यात शुल्क कमी केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी सरकारने कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि बाजारभाव स्थिर राहण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.

    कांदा उत्पादनाचा खर्चच निघत नाही. सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावे. शेतकरी आता बाजारभावात सुधारणा होण्याची प्रतीक्षा करत असून, कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. –जनार्दन काळे, शेतकरी, निफाड

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed