• Sun. Mar 15th, 2026
    पाकिस्तानी दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांनाही गोळ्या घाला, शिवसेना आमदार संतोष बांगर आक्रमक

    Contributed by तुषार शेट्ये | Edited byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Apr 2025, 11:50 am

    Santosh Bangar on Pahalgam Attack : पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर अनन्वित अत्याचार होत असून भारतात मात्र विशिष्ट धर्मांच्या व्यक्तींसाठी पायघड्या घातल्या जातात. मग अशावेळी सामाजीक बांधिलकी, सर्वधर्म समभाव कुठे गेला असा सवाल संतोष बांगर यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना केलाय.

    Santosh Bangar : पाकिस्तानी दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांनाही गोळ्या घाला, शिवसेना आमदार संतोष बांगर आक्रमक

    संतोष शेट्ये, हिंगोली : अनेक वादग्रस्त वक्तव्यं आणि आक्रमक कृतीमुळे कायम चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘मला संधी द्या, खून का बदला खून से घेणार’ अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यातच आता पुन्हा एकदा, ‘सर्वसामान्य जनतेसमोर अतिरेक्यांना गोळ्या घाला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना थेट गोळ्या घाला असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये संतोष बांगर यांनी हे वक्तव्य केलंय.

    … ते सुद्धा दहशतवादीच

    ‘भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे सुद्धा दहशतवादी आहेत. क्रिकेटच्या मैदानात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना या देशात राहाण्याचा अधिकार नसल्याचं बांगर म्हणाले आहेत. दहशतवादाला धर्म नसतो, मात्र जे दहशतवादी आहेत, ते एका विशिष्ट धर्माचेच का असतात ? असा प्रतिप्रश्ननही त्यांनी केलाय. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर अनन्वित अत्याचार होत असून भारतात मात्र विशिष्ट धर्मांच्या व्यक्तींसाठी पायघड्या घातल्या जातात. मग अशावेळी सामाजीक बांधिलकी, सर्वधर्म समभाव कुठे गेला असा सवाल त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांना केलाय.
    Nagpur Crime : माझ्या बायकोचं परपुरुषासोबत अश्लील कृत्य, ‘त्या’ साईटवर मी व्हिडिओ पाहिला, पतीची तक्रार, नागपुरात खळबळ

    आम्हालाही तलवार चालवता येते…

    ‘आम्हाला सुद्धा तलवार, लाठ्या-काठ्या चालवता येतात. मात्र आम्ही त्याचा उपयोग विधायक कामांसाठीच करणार आहोत. मात्र वारंवार देशविघातक कृत्य घडत असतील. त्यांना काही लोकांकडून खतपाणी मिळत असेल तर त्यांना जसच्या तसं प्रत्त्युत्तर दिलं जाईल’, असंही बांगर म्हणाले.

    Pune Crime : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण, ‘बाप्या’ची शारीरिक सक्षमता तपासणार, डीएनए चाचणीचीही तयारी

    मी माझा आक्रमकपणा सोडणार नाही

    सततच्या होणाऱ्या टीकेलाही बांगरांनी ठोस प्रत्त्युत्तर दिलंय. ‘माझी भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची आहे. त्यामुळे माझ्या आक्रमकपणाचा, भूमिकेचा फायदा त्यांना होत असेल, तर टीकाकारांना घाबरून मी माझा आक्रमकपणा सोडणार नसल्याचं बांगरांनी सांगितलंय. मी आमदार नंतर आधी शिवसेनाचा जिल्हाप्रमुख आहे हे लोकांनी विसरू नये.’ प्रखर हिंदुत्व आणि आक्रमकपणाच्या मुद्यामुळेच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेसोबत आल्याचं त्यांनी सांगितलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed