• Tue. Mar 10th, 2026
    अलर्ट! तप्त उन्हाळ्यात महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात राहणार मिश्र वातावरण

    Weather Forecast of Maharashtra : महाराष्ट्रभर नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महाराष्ट्रभर नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तर तापमानाचा रोज नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यातही सूर्य तळपला आहे. अशातच राज्यात पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण (Maharashtra Weather) राहणार असल्याची माहिती आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

    हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक्स हँडलवर ट्विट करत यासंदर्भीत माहिती दिली आहे. ते म्हणाले, हवामान विभागाने राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत मिश्र प्रकारचे तीव्र हवामानची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात २७ आणि २८ एप्रिलला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अकोला आणि चंद्रपूरमध्येच उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आता गारपिटीचाही अंदाज आहे. ज्यासाठी हवामान विभागाने आता चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी २७ एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.

    Weather 26/04

    ‘मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात देखील मिश्र वातावरण असणार आहे. या प्रदेशात उष्ण आणि दमट परिस्थिती असणार आहे. तसेच गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज दक्षिण कोकणात गडगडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.’ असेही होसाळीकर यांनी नमूद केले.

    Weather 27/04

    तर २८ एप्रिलला विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत यलो अलर्ट असणार आहे. तर भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Weather 28/04

    विदर्भवासीयांना उन्हाळा तीव्र झळा बसत आहेत. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर जाणे जीवावर येते. ही स्थिती असते मे महिन्यात. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यातच ही उष्णता नकोशी झाली आहे. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. अशात पावसाचा इशारा देण्यात आल्याने विदर्भवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांनी शेतीपिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed