• Fri. Mar 13th, 2026
    भाजपचे मंत्री शिवसेना आमदारावर तोफ डागत स्पष्टच म्हणाले,  ‘ज्यांना युतीत राहायचे नसेल ते…’; महायुतीत बिघाडी?

    Atul Save on Shivsena MLA Baburao Kadam : तांडा वस्ती सुधार निधीवरून शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने नाराजी व्यक्त करत थेट नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र पाठवून इशारा दिला होता. त्यावर मंत्री अतुल सावे यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना आमदाराला इशारा दिला आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : तांडा वस्ती सुधार निधीवरून शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने नाराजी व्यक्त करत थेट नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र पाठवून इशारा दिला होता. त्यावर मंत्री अतुल सावे यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना आमदाराला इशारा दिला आहे. पाच वर्ष आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतो, ज्यांना युतीत राहायचे त्यांनी राहावे ज्यांना नसेल राहायचे ते बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी नांदेडमध्ये दिली. महायुतीच्या आमदारांनी तांडा वस्ती निधी वरून नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री अतुल सावे आज नांदेडला आले होते.

    तांडा वस्ती निधी वाटपावरून नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र लिहिले होते. तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही मंजुरी न देता पक्ष विरोधी लोकांना मंजुरी दिली. ही गंभीर बाब असून नांदेड दौऱ्यावर आल्यावर याबाबत असंख्य कार्यकर्ते घेऊन जाब विचारणार असा इशारा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी पत्रात दिला होता. त्यावर मंत्री अतुल सावे यांनी देखील शिवसेना आमदाराला प्रत्युत्तर दिले आहे.

    विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीवरून महायुतीच्या आमदार नाराज असल्याचे चित्र आहे. भाजप चे आमदार तुषार राठोड आणि आमदार भीमराव केराम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री अतुल सावे यांची तक्रार केली होती, त्यांनतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी मुखेड कंधार या दोन तालुक्यातील ७ कोटी २५ लाख रुपयाच्या कामाना स्थगिती दिली. शिवाय शिवसेन सेनेचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी देखील आक्षेप व्यक्त करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वरून नांदेडमध्ये महायुतीत अलबेल असल्याचे चित्र आहे. दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराला थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे.

    टंचाई व नियोजनसंदर्भात अतुल सावेंची आढावा बैठक

    नांदेड दौऱ्यादरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्याच्या विकास कामाच्या आढावा घेतला. शहरातील शासकीय विश्रामगृह नांदेड येथे विविध विभागांच्या बैठका त्यांनी घेतल्या. उन्हाळ्याच्या दिवसातील विविध विभागांकडून होणारी टंचाई निवारण व जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी आज दिला. तसेच जिल्हा नियोजन समितीचे आराखडे देताना अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण आराखडे सादर करण्याबाबत तयारीला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed