• Sat. Mar 7th, 2026
    चार मित्र लग्नाला गेले, परतताना मात्र पोहण्याचा मोह आवरेना; निरा कालव्यात उतरताच तरुणाला काळाने घेरले

    Baramati News : पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी गेले असता एकावर काळाचा घाला पडला आहे.

    Lipi

    दीपक पडकर, बारामती : पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी आले होते. तेथून घऱी परत जाताना बारामती तालुक्यातील निंबुतजवळील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी उतरले असता, त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

    हडपसर येथील भेकराईनगरमधील तुषार पोपट खेडकर (वय २१), गौरव गजानन भोसले, मंगेश कैलास शेळके आणि सूरज रामदास चौगुले हे मित्र दोन मोटारसायकलवरून फलटणला लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता पुण्याकडे परतत असताना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निंबुत छपरी येथील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी सर्व मित्र पाण्यात उतरले.
    Nalasopara Crime : आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं
    पोहताना तुषार खेडकरचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढले आणि वाघळवाडी येथील साई सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

    या घटनेची निखिल रमेश कुन्हाडे (रा. भेकराईनगर, हडपसर) याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

    नांदेडातून देखील अशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्न सोहळ्यात मंडप उभारण्याचं काम करताना दोन सख्ख्या चुलत भावांना वीजेचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. हदगांव तालुक्यातील बोरगाव हस्तारा वस्तीत शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने लग्नसोहळ्यात शोककळा पसरली आहे. मृत भावांचा मंडप आणि डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी गावात लग्नसमारंभ असल्याने त्यांना मंडपाचे काम मिळाले होते. पांडुरंग भट्टेवाड आणि साईनाथ भट्टेवाड या दोघे मंडप उभारत होते. इतक्यात सोसाट्याचा वारा आला आणि मंडप हवेत उचलला गेला. त्यामुळे मंडपाला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि दोघांनाही वीजेचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed