Baramati News : पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी गेले असता एकावर काळाचा घाला पडला आहे.
हडपसर येथील भेकराईनगरमधील तुषार पोपट खेडकर (वय २१), गौरव गजानन भोसले, मंगेश कैलास शेळके आणि सूरज रामदास चौगुले हे मित्र दोन मोटारसायकलवरून फलटणला लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता पुण्याकडे परतत असताना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निंबुत छपरी येथील निरा डावा कालव्यात पोहण्यासाठी सर्व मित्र पाण्यात उतरले.
Nalasopara Crime : आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं
पोहताना तुषार खेडकरचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढले आणि वाघळवाडी येथील साई सेवा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेची निखिल रमेश कुन्हाडे (रा. भेकराईनगर, हडपसर) याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
नांदेडातून देखील अशी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्न सोहळ्यात मंडप उभारण्याचं काम करताना दोन सख्ख्या चुलत भावांना वीजेचा जोरदार धक्का बसला आहे. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. हदगांव तालुक्यातील बोरगाव हस्तारा वस्तीत शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने लग्नसोहळ्यात शोककळा पसरली आहे. मृत भावांचा मंडप आणि डेकोरेशनचा व्यवसाय आहे. रविवारी गावात लग्नसमारंभ असल्याने त्यांना मंडपाचे काम मिळाले होते. पांडुरंग भट्टेवाड आणि साईनाथ भट्टेवाड या दोघे मंडप उभारत होते. इतक्यात सोसाट्याचा वारा आला आणि मंडप हवेत उचलला गेला. त्यामुळे मंडपाला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि दोघांनाही वीजेचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे.

