• Mon. Mar 16th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ‘ममता’ यांचीच हिंसाचाराला चिथावणी; पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत केंद्रीय मंत्री रिजिजू यांचा आरोप

    ‘पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायदा लागू करणार नाही असे सांगत, तसेच लोकांना त्याविरोधात निदर्शने करण्यास प्रोत्साहन देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच हिंसाचाराला चिथावणी देत आहेत,’ असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला. ‘ममता बॅनर्जी स्वत: घटनात्मक पदावर बसल्या आहेत. घटनात्मक यंत्रणेने वक्फ कायदा मंजूर केला आहे. असे असताना, घटनात्मक कायद्याचे पालन करणार नाही, असे ममता बॅनर्जी कसे काय म्हणू शकतात,’ असा प्रश्न रिजिजू यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती, धुलियान आणि जांगीपूर भागात शुक्रवार आणि शनिवारी हिंसक निदर्शने करण्यात आली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed