• Thu. Apr 24th, 2025 8:46:34 AM
    Nitin Gadkari : आता टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

    Nitin Gadkari Big Announcement About Toll : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की, लवकरच ‘जितका प्रवास, तितकाच पथकर’ हे नवीन धोरण लागू होणार आहे. येत्या १५ दिवसांत उपग्रह आधारित पथकर प्रणाली सुरू होईल, ज्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांना थांबावे लागणार नाही. रस्ते विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद असून, राष्ट्रीय महामार्गांवर किलोमीटरनुसार पथकर आकारला जाईल.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘आता जितका प्रवास, तितकाच पथकर द्यावा लागेल. या नवीन धोरणाची अंमलबजावणी १५ दिवसांत केली जाईल’, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी सोमवारी केली. दादर येथील अमरहिंद मंडळाच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. Nitin Gadkari Big Announcement About Toll पथकर नाक्यांवर वाहनांना थांबावे लागू नये, यासाठी उपग्रहआधारित पथकराची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

    ‘रस्ते बांधणीसाठी यंदा ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल, तितकाच पथकर घेतला जाईल, असे धोरण लवकरच आणण्यात येणार आहे’, असे गडकरी म्हणाले.

    ‘विकासाचा संबंध रस्त्यांशी आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात रस्ते, महामार्गांचा मोठा वाटा आहे. देशातील दळणवळणाचा खर्च कमी होणे आवश्यक असून, ते रस्त्यांद्वारेच शक्य आहे. सध्या प्रगत देशाच्या तुलनेत दळणवळणाचा खर्च आपल्याकडे अधिक आहे. तो सध्याच्या १६वरून नऊ टक्क्यांवर आणला जाणार आहे’, असे गडकरी यांनी सांगितले. ‘आपण दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांचे खनिज तेल आयात करतो. २००४पासून पेट्रोल आणि डिझेलच्या पर्यायाची चाचपणी करीत आहोत. आता शेतकऱ्यांनी पर्यायी ऊर्जेची निर्मिती करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी इथेनॉलबरोबरच हायड्रोजन बायो फ्युएल वापरायला सुरुवात होणार आहे. कचऱ्यापासून मिथेन जैवइंधन तयार करण्यासाठी ४०० कारखाने सुरू होणार असून, त्यातील ९० कारखाने सुरू आहेत. भाताचे धांड जाळून प्रदूषण होण्यापेक्षा त्यातून इंधन बनवण्यावर भर दिला जाईल’, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात भारताला जलमार्ग बांधावे लागतील. येणाऱ्या काळामध्ये १०८ जलमार्गांची निर्मिती हे लक्ष्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed