• Sun. Jun 14th, 2026

    Tukaram Mundhe यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; मराठा आंदोलक जरांगे म्हणाले, ‘सरकारने त्या भानगडीत पडूच नये’

    Tukaram Mundhe यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; मराठा आंदोलक जरांगे म्हणाले, ‘सरकारने त्या भानगडीत पडूच नये’

    Manoj Jarange Patil On Tukaram Mundhe: भेसळखोरांविरोधातील तुकाराम मुंढेंच्या कारवायांची राज्यभर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या बदलीच्या चर्चाही सुरु आहेत, त्यावरुन आता मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला नेमका काय इशारा दिला?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे राज्यातील भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसांतच भेसळीविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली. अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाईसह मकोका लावण्याचा इशारा दिल्याने अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या मोहिमेची राज्यभर चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा त्यांच्या बदलीच्या शक्यतेबाबत चर्चा रंगू लागली आहे.

    आपल्या कडक आणि पारदर्शक प्रशासनशैलीसाठी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत २५ वेळा बदली झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर छापे टाकत कोट्यवधी रुपयांचा संशयित भेसळीचा साठा जप्त केला. त्यांच्या कारवाईमुळे अनेक अवैध रॅकेट उघडकीस आली असून सर्वसामान्यांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

    दरम्यान, मुंढे यांच्या कामकाजाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या बदलीबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे हे जनहिताचे काम करत असून त्यांच्या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

    Maharashtra TimesLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठी उलथापालथ, एकाच जिल्ह्यातल्या 33 हजार महिला कायमच्या अपात्र; राज्यभरातील लाभार्थ्यांची धाकधूक वाढली

    सरकारने बदलीचा विचार करू नये; अन्यथा…

    मनोज जरांगे पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत सरकारने त्यांच्या बदलीचा विचार करू नये, असे स्पष्टपणे सांगितले. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यास सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, तर दुधातील भेसळीवर नियंत्रण आल्यास शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला योग्य दर मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सरकारने त्यांच्या कामात अडथळे आणू नयेत, त्या भानगडीत सरकारने पडूच नये, अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

    शेतकरी प्रश्नांवरही भाष्य

    यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते आंदोलन करत असल्याने त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ कर्जमाफी नव्हे, तर संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा