• Sat. Mar 14th, 2026
    शिर्डीत पकडण्यात आलेल्या ४ भिक्षेकऱ्यांचा मृत्यू; रुग्णालयात ठेवलेलं बांधून; घटनेनं खळबळ

    Shirdi News: अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.

    Lipi

    – प्रसाद शिंदे, नगर: अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आलं होतं. त्यातील १० भिक्षेकर्‍यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापैकी चार जणांचा आज मृत्यू झाला.

    मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या भिक्षेकऱ्यांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. त्या रूमला टाळं ठोकण्यात आलं होतं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रुग्णांना साधं पाणीदेखील देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. अशोक बोरसे, सारंधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, ईसार शेख अशी मृतांची नावं आहेत.
    तरुणीवर २३ जणांकडून ७ दिवस सामूहिक अत्याचार; हॉटेल, गोदाम, धावत्या कारमध्ये भयंकर प्रकार
    रुग्णांना दारुचं व्यसन असल्यानं ते उपचारांवेळी त्रास देत होते. त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं, असा दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केला आहे. भिक्षेकऱ्यांवर कोणते उपचार झाले, कोणाच्या हलगर्जीपणा ४ जणांचा जीव गेला, याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयानं केवळ २ भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात ४ जणांचा मृत्यू असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली आहे.
    उजवा हात फ्रॅक्चर, डाव्या हातानं दाबला पतीचा गळा; हार्ट अटॅकचा कांगावा, PMमुळे खुनाचा उलगडा
    विसापूर कारागृहातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आम्हाला बांधून ठेवण्यात आलं होतं. अन्न पाणी देण्यात आलं नाही. उपचारही केले गेले नाहीत, असं भिक्षेकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. श्रीराम नवमीच्या आधी शिर्डी पोलिसांनी भिक्षेकऱ्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यातील काही भिक्षेकऱ्यांना विसापूरला रवाना करण्यात आलं होतं. यातल्याच १३ जणांना जिल्हा रुग्णालयांना दाखल केलं गेलं होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed