Santosh Deshmukh Murder Case : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींनी कबुली दिली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी मॅनेजरकडून खंडणी मागितली होती व त्यानंतर देशमुख यांना मारले. आरोपींनी दिलेल्या कबुलीने वाल्मिक कराड अडचणीत आला आहे. आमदार सुरेश धस यांनी कारवाईची मागणी केली आहे.
सुदर्शन घुले याने हत्यारे कशी तयार केलीत ते अपहरणापासून हत्या कशी केली याबाबत सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या झाली हे जवळपास निश्चित झालं आहे. आवादा कंपनीमध्ये हे खंडणी मागण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यातील प्रतीक घुले याचा वाढदिवस होता. देशमुख आणि ग्रामस्थांनी आम्हाला मारहाण केली. यामधील आमचा मित्र प्रतिक घुले याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आम्हाला राग आमच्या मनात होता. त्यानंतक दुसऱ्या दिवशी तिरंगा हॉटेलवर बैठक झाली. तिथे विष्णू चाटे याने तुम्ही अवमान करून अपयशी आलेला आहात असं तो त्यांना म्हणाला. त्यानंतर घुलेने देशमुखांना संपवण्यचं ठरवलं. आरोपींच्य वकिलांना लिफाफ्यामध्ये चार्जशीट आणि गुन्हा घडण्याआधीचा व्हिडीओ त्यांना देण्यात आलेले आहे.
मकोका गुन्ह्यामध्ये कबुली जबाब हा आयपीएस अधिकाऱ्यासमोर नोंदवला जातो. त्यानुसार सुदर्शन घुले याने दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य मानला जातो. त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुदर्शन घुले हो नंतचा अॅक्टर आहे. जो आपल्याला आडवं यईल त्याला आडवं करायचं. वाल्मिक कराड यातील प्रमुख आरोपी आहे. हा कबुली जबाब अत्यंत महत्त्वाचं आहे. केसला आता सुरूवात झाली आहे. माझा रोख कोणाकडे नाही पण ज्यांची नाव येतील त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.

