Bhushansingh Raje Holkar News : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून माजी खासदार संभाजीराजे यांनी समाधी हटवण्याची मागणी करत सरकारला पत्र लिहिले आहे. आता त्यावर भूषणसिंह राजे होळकर यांनी सरकारकडे वेगळी मागणी केली आहे. वाघ्याच्या समाधीवरून वाद रंगताना दिसतोय.
या सर्व प्रकरणानंतर आता भूषणसिंह राजे होळकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही बाजू मांडल्या आहेत. भूषणसिंह राजे होळकर यांनी म्हटले की, सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की, शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी कर्तृवाच्या जोरावर सर्व माणसे निवडली जातीवर नाही. तीच परंपरा होळकर घराणे असेल, गायकवाड, शिंदे यांनीही पुढे चालवली. मागील दोन दिवसांपासून मी वाघ्या कुत्र्याचे प्रकरण पाहतोय. अनेक संघटना याबद्दल भूमिका घेत आहेत.
Sambhaji Raje : वाघ्याच्या स्मारकाची उंची महाराजांच्या समाधीहून अधिक, हे पटेल का? संभाजीराजे छत्रपतींचा सवालवाघ्याचे जे प्रकरण आहे ते दोन्ही गटांसाठी अस्मितेचा विषय झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेळी वाघ्या सुत्र्याचे अस्तित्व होते की, नाही यावर मी बोलणार नाहीये. कारण हा इतिहासाचा आणि इतिहासाच्या अभ्यासकांचा विषय आहे. या स्मारकाबद्दल अनेक लोकांच्या भावना आहेत आणि त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे की, कोणती बाजू बरोबर आहे आणि कोणती चुकीचे यामध्ये न पडता शासनाने एक समिती नेमावी. त्यामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात. समितीने दिलेला निर्णय सर्वांनी मान्य करावा.
पुढे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले की, दोन्ही बाजू ऐकून घेताना राजकीय पुढाऱ्यांना दूर ठेऊन इतिहास अभ्यासकांना त्यामध्ये कसे घेता येईल हे पाहावे. या प्रकरणात राजकारण आणू नये. होळकरांचा संबंध येत असल्याने आमच्या समाजाची भावना या स्मारकासोबत जोडलेली आहे. भावनेचा अनादर केलेली विधाने खपवून घेणार नाही, असाही थेट इशारा त्यांनी यावेळी दिला. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत हा प्रश्न सोडवावा असे भूषणसिंह राजे यांनी म्हटले.
भूषणसिंह राजे होळकर म्हणाले, यामध्ये दुसरी एक अशी महत्वाची बाजू आहे. काल एका पत्रकार परिषदेमध्ये एका माणसाने सांगितले की, होळकर हे इंग्रजांना घाबरत होते. मला त्यांना हेच सांगायचे आहे की, भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधात जर शेवटपर्यंत कोणी लढा दिला असेल तर ते महाराजा यशवंतराव होळकर होते. महाराजा यशवंतराव होळकरांच्या मृत्यूनंतर भीमाबाई होळकर आणि यशवंतराव होळकरांचे चिरंजीव मल्हारराव होळकर हे वयाच्या १९ व्या वर्षी इंग्रजांच्या विरोधात लढत होते. सेटलमेंट करून होळकरांनी कधीच इंग्रजांसोबत तह केला नाही. होळीकर इंग्रजांना घाबरत होते हे विधान ज्याने कोणी केले त्याला मला विचारायचे आहे की, तुमचा इतिहासाचा अभ्यास किती आहे हे बघा.

