• Fri. Mar 6th, 2026
    घराकडे निघाला पण पोहोचलाच नाही, वाटेत इकोची धडक अन् लग्नाच्या महिन्याभरातच तरुणाचा मृत्यू

    Ratnagiri Accident News: एक होतकरु शेतकरी, यशस्वी आंबा व्यवसायिक असलेल्या एका तरुणाच्या अकाली एक्झिटने संपूर्ण परिसरात अकच खळबळ माजली आहे. या तरुणाच्या लग्नाला फक्त एक महिना झाला असल्याची माहिती आहे.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: अलीकडे रत्नागिरीत रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चार दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा दुजाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नाखरे येथील एका युवकाचाही दुचाकी अपघातात दुर्देवी अंत झाला आहे. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं या तरुणाचं नाव आहे. चंद्रवदन हा पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जात असताना त्याच्या दुचाकीला अपघाता झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. नेहमी हसतमुख चेहरा असलेल्या आंबा बागायत युवकाने अचानक जगातून एक्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

    रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचे नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असे असून, तो नाखरे येथील रहिवासी होता.
    मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका चारचाकी इको गाडीशी जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडला.

    चंद्रवदन हा एक हसतमुख चांगल्या स्वभावाचा तरुण असल्याचं त्याचे मित्र सांगतात. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि नुकतेच महिन्याभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    त्याचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. अशा अचानक त्याच्या जाण्याने त्याची नवविवाहित पत्नीला मोठा धक्का बसला आहे. लेकाचं लग्न झाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. मात्र, या घटनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed