• Wed. Apr 16th, 2025 6:10:03 AM
    औरंगजेबाचं उदात्तीकरण; अटकेची टांगती तलवार असणाऱ्या अबू आझमी यांना मोठा दिलासा, कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

    Abu Azmi Relief from arrest : औरंगजेबाची भलामण करणाऱ्या आमदार अबू आझमींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अबू आझमींनी औरंगजेब ‘उत्तम प्रशासक’ होता असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट पसरल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण आता न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : औरंगजेबाची भलामण करणाऱ्या आमदार अबू आझमींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अबू आझमींनी औरंगजेब ‘उत्तम प्रशासक’ होता असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यातून सर्वच स्तरातून विरोध करण्यात आला. याचे पडसाद विधानसभेतही उमटले आणि त्यांना विधानसभेतून या अर्थसंकल्पीय सत्रासाठी निलंबित करण्यात आले. तर त्यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट पसरल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला तर प्रकरण न्यायालयातही पोहोचले. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण आता न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. २० हजार रुपयांच्या बाँडवर त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले. तर त्यांना १२, १३ आणि १५ तारखेला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

    अबू आझमी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार आहेत. अबू आझमी यांनी विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला औरंगजेबावरुव वादग्रस्त वक्तव्य केले. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नसून उत्तम प्रशासक होता अशी भलामण त्यांनी केली. अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्याची प्रतिमा सध्या देशात चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. त्यांच्या काळात भारत देशाची ओळख ‘सोने की चिडिया’अशी होती. मग त्या औरंगजेबाला वाईट म्हणावं का? असे विधान अबू आझमींनी केले होते.

    अबु आझमींनी विधान घेतलं मागे

    सर्वच स्तरातून विरोध वाढू लागताच अबु आझमींनी आपले विधान मागे घेतले होते. ते म्हणाले, ‘इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारावरुन मी औरंगजेबाचं कौतुक केलं. मी महापुरुषांविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. पण माझ्या वक्तव्याची मोडतोड करुन कुणाला वाटत असेल की मी कुणाच्या भावना दुखावल्या आहेत. तर मी माझं वक्तव्य मागे घेतो. विधानसभेचं कामकाज सुरु राहायला पाहिजे. विधानसभेत खूप सारी कामं आहेत. विधानसभेला या मुद्द्यावरुन रोखणं योग्य नाही. विधानसभा रोखली तर महाराष्ट्र आणि जनतेचं खूप सारं काम थांबून राहील,’ असे स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed