अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार गंभीर आरोप करत आहेत. भाजपकडून गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केलेली. भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादांच्या अपघाती निधनाचे राजकारण करू नये, असे महाजन यांनी म्हटले. राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही असे वलगर विधान करू नये, असेही ते म्हणाले.