Ajit Pawar And Political Reactions On Dhananjay Munde Resignation: “मला अजून काहीच माहिती नाही. मला खरंच काही माहिती नाही, मला आधी पाहू द्या. मी महत्त्वाचे फोन देखील घेतले नाहीत. तुम्ही प्रोटोकॉल पाळायला हवा, मी तुम्हाला येऊन व्यवस्थित सांगते” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
विधीमंडळ परिसरात आल्यानंतर माध्यमांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला. तेव्हा, “मला अजून काहीच माहिती नाही. मला खरंच काही माहिती नाही, मला आधी पाहू द्या. मी महत्त्वाचे फोन देखील घेतले नाहीत. तुम्ही प्रोटोकॉल पाळायला हवा, मी तुम्हाला येऊन व्यवस्थित सांगते” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी विमानातून आताच उतरले आहे. याबद्दल मला अजून काहीच माहिती नाही. “राज्यपाल महोदयांसोबत मी आहे, मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन माध्यमांशी बोलते”, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे सांगितल्यानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गाठले. माध्यमांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी त्यांना विचारल्यावर, मंत्री धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या जबाबदारीमुळे आपला राजीनामा दिल्याचे सांगत, काढता पाय घेतला.
“पंकजा मुंडे म्हणतात की, बीड जिल्ह्याचे प्रश्न काय विचारता पुण्याचे विचारा. त्याच्यापेक्षा त्यांना बीड जिल्हा काय, राज्य आणि देशपातळीवरचे प्रश्नही विचारु नका. त्या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झाल्या आहेत. त्यांना तेच प्रश्न विचारा”, असे सुरेश धस यांनी म्हटले. “माझी मीडियाला नम्र विनंती आहे की, आमच्या पंकजाताईंना राज्य सरकारने पर्यावरण विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण देशात आणि जगात पर्यावरणाचे प्रश्न बघावे लागतात. त्यामुळे तु्म्ही पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारत जाऊ नका. कारण त्यांना बीड बीड जिल्ह्याबद्दल सोयरंसुतक राहिलेलं नाही”. असेही सुरेश धस यांनी म्हटले.

