• Sun. Mar 15th, 2026
    ‘संवाद स्थापित करण्याची एक संधी होती, पण…’ मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

    CM Devendra Fadnavis : महायुतीच्या पत्रकार परिषदेदरम्यान विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंंबई : सोमवारपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्याने मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे. विरोधकांशी संवाद स्थापित करण्याची संधी होती, पण विरोधकांनीच चहापानावर बहिष्कार टाकावा हे ठीक नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधी पक्षाने ९ पानी पत्र दिले पण यावर काहींनी सह्या केलेल्या नाहीत. आता विरोधक म्हणल्याप्रमाणे काही ‘हम साथ साथ है’ अशी परिस्थिती दिसत नाहीये. महाविकास आघाडीत युती असल्याचे वाटत नाही. विरोधकांशी संवाद स्थापित करावा असे आम्ही पत्रकार परिषदेत म्हटले होते. पण या संवादावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अशाप्रकारे बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधावा असंही म्हणावं, हे विरोधाभासी आहे.
    Eknath Shinde : महायुतीत Cold War सुरु? एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर म्हणाले…
    फडणवीस पुढे म्हणाले, रोज मला अशी बातमी ऐकायला मिळते की, कामाला स्थगिती दिली. अलीकडच्या काळात, आमदाराने पत्र दिलं आणि आपण स्थगिती दिली. असं झालेलं नाही. आपल्याला स्थगिती द्यायची म्हणजे दुसरी बाजू आल्याशिवाय आपण स्थगिती देत नाही. आवश्यकता पडली तर ज्या मंत्र्यांचे खातं असणार त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.

    तर मुख्यमंत्र्यांनी पुढे लाडकी बहीण योजनेबाबतही मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही. हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जाणार आहेत.’ परंतु याचवेळी नियमाच्या बाहेर जे आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे. कारण ‘कॅग’ने त्याबाबत आपल्यावर बंधन टाकले आहे. त्यानुसार, पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत करता येणार आहे, अपात्र लोकांना नाही. त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.’
    शिंदे म्हणतात, ‘अजितदादांची खुर्ची फिक्स,’ दादा उत्तरले, ‘तुम्हालाच खुर्ची फिक्स…’, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची टोलेबाजी
    शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आम्हाला महाराज पूर्ण माहीत आहे. आम्ही महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर काम करणारे आहोत. महाराजांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना आम्ही कोणालाही वाचवणार नाही. आम्ही महाराज पुरेपूर माहित आहेत. अफजलखानामुळे शिवाजी महाराज कसे मोठे झाले, असे लोकं शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला सांगत असतील. महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर काम करणारे आम्ही तिघे मावळे आहोत, मावळे म्हणूनच काम करणार, असे खडेबोल देखील मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed