Pune News: महामार्गावरील वाहतूक पुणे शहराबाहेर वळवण्यासाठी पुणे रिंग रोडचा प्रस्ताव सादर केला आहे. 117 गावांमधून जाणाऱ्या या मार्गाचा आराखडा अद्याप तयार नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: शहरालगतच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी (रिंग रोड) नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) दिलेली ११७ गावे पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीच या गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार केला होता. ती रस्ते महामंडळाकडे गेल्यानंतर पुन्हा नव्याने विकास आराखड्याचा इरादा जाहीर करण्यात आला आणि आता पुन्हा ‘पीएमआरडीए’लाच या गावांचा संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारने या गावांच्या नियोजनाचा खेळखंडोबा मांडल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
१३७ किलोमीटरचा लांबीचा रिंग रोड
‘एमएसआरडीसी’कडून १३७ किलोमीटरचा लांबीचा रिंग रोड तयार करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी (सन २०२४) राज्य सरकारने रिंग रोडलगतच्या पाच तालुक्यांतील ११७ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ची नियुक्ती केली. ही गावे आपल्या हद्दीतील असल्याने या गावांचा प्रारूप विकास आराखडा ‘पीएमआरडीए’ने तयार केला होता. त्यानुसार रिंग रोडलगत दोन विकास केंद्रे प्रस्तावित करण्यात आली होती, तीदेखील ‘एमएसआरडीसी’नेच विकसित करावीत, असे सरकारने ठरवले. या ११७ गावांतील ६६८ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ काम पाहील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या गावांचा विकास आराखडा करण्यासाठीचा इरादा जाहीर केला.
Purandar International Airport : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प; भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्याकरिता ३० जूनपर्यंत मुदतवाढ, कारण काय?
आता पुन्हा ही गावे स्ट्रक्चरल प्लॅन करण्यासाठी पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या गावांच्या विकासाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिसूचित क्षेत्रात यापूर्वी समाविष्ट असलेल्या हवेली, भोर, पुरंदर, मुळशी, वेल्हे या तालुक्यांतील ही गावे आहेत. त्यांच्यासाठी १० ऑक्टोबर २०२४च्या सरकारी अधिसूचनेद्वारे ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली गेली. मात्र, या गावांचे क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्राशी संलग्न असून, भौगोलिक दृष्ट्या ‘पीएमआरडीए’च्या अधिसूचित क्षेत्राने वेढलेले आहे.
Kalyan ST Bus: कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू
बैठकीत काय सांगितलं?
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना सुधारित अधिनियमानुसार ‘पीएमआरडीए’नेच या गावांचा संरचनात्मक आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. त्यामुळे एकसंध, एकात्मीकृत व एकसमान नियोजन साध्य करण्यासाठी व विकास प्रक्रियेचे सुलभीकरण होण्यासाठी या गावांसाठी ‘पीएमआरडीए’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सरकार मान्यतेसाठी सादर करावा. या क्षेत्रासाठीचा संरचनात्मक आराखडा झाल्यानंतर गरजेनुसार त्यातील काही क्षेत्र ‘एमएसआरडीसी’कडे विशेष नियोजन प्रकल्पासाठी देता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत सांगितले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा