• Sun. Jun 14th, 2026
    ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, परिसरात हळहळ

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Mar 2025, 9:08 am

    class 11th student ends life : उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, अनेक स्वप्न घेऊन शहरात येतात. अशीच काही स्वप्नं घेऊन आलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येमागे, नागरिकांचं रक्षण करणारे पोलीसच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रियंका जाधव, बुलढाणा : ११ वीत शिकणाऱ्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृताच्या नातेवाईकांनी, पोलिसांच्या जाचामुळे युवकाने आत्महत्या केली असून संबंधित पोलिसांवर आणि खोटी तक्रार देणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी असलेल्या, इयत्ता ११वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, अनेक स्वप्न घेऊन शहरात येतात. अशीच काही स्वप्नं घेऊन आलेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येमागे, नागरिकांचं रक्षण करणारे पोलीसच असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या जलाराम सोसायटीमध्ये हि दुर्दैवी घटना घडली. ११वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्यावरील खोट्या आरोपांमुळे आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत युवक उच्च शिक्षण घेण्याकरिता शहरात रहाण्यास आला होता. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवाशी होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवक हा नीट च्या परीक्षेची तयारी करत होता. साधारणतः दीड महिन्यांपूर्वी एका अन्य विद्यार्थ्यासोबत त्याचा वाद झाला होता. आणि यातूनच त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आलं असा आरोप मृत युवकाच्या मामाने केला आहे. पीडित युवकावर कारवाई न करण्याकरिता सिव्हिल लाईन पोलीस स्थानकातील एक पोलीस तपास अधिकारी सतत त्याच्याकडे पैशाची मागणी करत होता. मात्र पैसे न दिल्याने तो अधिकारी पीडित युवकाला पोलीस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास द्यायचा असा आरोप युवकाच्या मामाने केला आहेय. पोलिसांच्या जाचामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली असून संबंधित पोलिसांवर आणि खोटी तक्रार देणाऱ्या विद्यार्थी वर कारवाई करण्याची मृत युवकाच्या नातेवाईकांनी केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed