• Sat. Mar 7th, 2026
    Aditya Thackeray: शिंदे केवळ मलिदा खाण्यातच पटाईत; किनारा मार्गावरील तड्यांवरुन आदित्य ठाकरेंची टीका

    Aditya Thackeray On Eknath Shinde: मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    aditya t eknath s

    मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ‘मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,’ अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले.

    सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच, ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली. ‘आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत. कोस्टल रोडवर ‘हाजी अली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,’ असे आदित्य यांनी लिहिले आहे.
    Jitendra Awhad: अजित पवार हे सारे थांबवा, अजून किती घरं…; पक्षप्रवेशाच्या नाट्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले
    ‘आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येच संपूर्ण तयार झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या,’ असा दावाही त्यांनी केला.
    पालकमंत्रिपद हुकणार? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षा प्रकरणाने राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर
    डांबरीकरणामुळे पालिका कोंडीत
    सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत, यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले. यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed