• Sat. Mar 14th, 2026
    गरज सरो वैद्य मरो… लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक; विजय वडेट्टीवारांची महायुती सरकारवर टीका

    Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojana: महायुती सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी फसवणूक राज्यकत्यांनी सुरू केली, असा हल्ला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चढवला.

    महाराष्ट्र टाइम्स
    wadettiwar

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: ‘निवडणुकीपूर्वी अॅडव्हान्स देणारे महायुती सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी फसवणूक राज्यकत्यांनी सुरू केली, असा हल्ला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चढवला.

    निवडणुकीपूर्वी मत विकत घेण्यासाठी लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले. सत्तेत आल्यानंतर विविध अटी लादून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. ही संख्या २५ टक्केपर्यंत आणण्याचे महापाप करणाऱ्या सरकारला त्यांची जागा बहिणीच दाखवतील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील निर्णयांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली. याचाच अर्थ महायुतीत मतभेद असल्याचे स्पष्ट होते. महायुतीचा कारभार स्वच्छ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांपासून त्याची सुरुवात केली, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. महायुतीच्या नेत्यांनी शेतकरी, महिलांना पोकळ आश्वासने दिली. परस्परांशी भांडून जनतेच्या कळीच्या प्रश्नावर विचलित केले जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, या मागणीचा विजय वडेट्टीवार यांनी पुनरुच्चार केला.
    पालकमंत्रिपद हुकणार? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षा प्रकरणाने राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर
    ‘महायुतीमध्ये मतभेद’
    ‘एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. हे महायुतीमधील मतभेद आहेत. महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला, त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली आहे. महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. लोकांना मात्र वाऱ्यावर सोडले गेले आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.’
    Jitendra Awhad: अजित पवार हे सारे थांबवा, अजून किती घरं…; पक्षप्रवेशाच्या नाट्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले
    आरोपी मंत्र्यांची पाठराखण
    उद्योगी व तेजस्वी नेते महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असल्याने सरकारची रोज लाज निघत आहे. आरोप होत आहेत, न्यायालयाकडून शिक्षेचे आदेश दिले जात आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लीनचिट देऊन पाठराखण करत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांतून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed