• Fri. Mar 13th, 2026

    Jitendra Awhad: अजित पवार हे सारे थांबवा, अजून किती घरं…; पक्षप्रवेशाच्या नाट्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले

    Jitendra Awhad: अजित पवार हे सारे थांबवा, अजून किती घरं…; पक्षप्रवेशाच्या नाट्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले

    Jitendra Awhad On Ajit Pawar: मला ब्लॅकमेल करून व खोट्या धमक्या देत माझा पक्षप्रवेश करण्यात आल्याची प्रतिक्रिया अभिजित पवार यांनी दिली. त्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत या पक्षप्रवेश नाट्यावरून टीकास्त्र सोडले.

    महाराष्ट्र टाइम्स
    jitendra awhad2

    म.टा.प्रतिनिधी, ठाणे :‘महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण बंद व्हायला हवे, माझ्या कार्यकर्त्यांना दुबईहून फोन येतो, कोणीतरी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी फोन करतात, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे. एका सूरज परमारचा जीव गेला आहे, राबोडीतील जमील शेखची हत्या झाली आहे, आणखी किती घरे उद्ध्वस्त करणार आहात,’ असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शप) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्यात केला.

    आव्हाड यांचे माजी स्वीय सहायक अभिजित पवार यांचा मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला होता. मात्र गुरुवारी अभिजित पवार स्वगृही परतले. मला ब्लॅकमेल करून व खोट्या धमक्या देत माझा पक्षप्रवेश करण्यात आल्याची प्रतिक्रिया अभिजित पवार यांनी दिली. त्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत या पक्षप्रवेश नाट्यावरून टीकास्त्र सोडले.
    निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम नव्हे, आपणच जबाबदार; अमित ठाकरेंची परखड भूमिका
    मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी अभिजित पवार यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला होता. ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शप) परतले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील नेत्यांनी मला ब्लॅकमेल करूनच माझा प्रवेश घडवला, असे अभिजीत पवार यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी आतातरी डोळे उघडावेत, माझी चौकशी करा, आणखी किती जणांची घरे उद्ध्वस्त करणार,’ असा प्रश्न आव्हाड यांनी केला.
    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा नागपूर पॅटर्न चर्चेत; ३००० महिलांनी एकत्र येऊन सुरु केली पतपेढी
    ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) शमीम खान यांनाही असाच त्रास दिला जात होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन व्यथा मांडल्याचे आव्हाड यांनी नमूद केले. अभिजित पवार यांनी ठाण्यातील विकासक सूरज परमार यांच्याप्रमाणेच या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःला संपवले असते,’ असा दावा आव्हाड यांनी केला.
    Mahakumbh 2025: गंगा-यमुनेचे पाणी स्नानासही अयोग्य; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात मोठा दावा
    मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
    राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करा, या प्रकरणाचे माजी तपास अधिकारी नितीन ठाकरे यांची नेमणूक करा, अशी मागणीही आव्हाड यांनी केली. आम्ही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहोत, ते असे राजकारण करत नाहीत, असेही आव्हाड म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed