Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम20 Feb 2025, 1:44 pm
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला नसतानाही मंत्री धनंजय मुंडेंनी 500 आणि 200 कोटींचा खोटा जीआर काढला असा बॉम्ब सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फोडला. दमानियांनी बुधवारी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. खोटं बोलून धनंजय मुंडे हे जीआर काढतात. त्यांची इतकी हिंमत होत असेल तर मुंडेंनी कोणत्याही मंत्रिपदावर कधीच बसता कामा नये. त्यांची तेवढी पात्रताच नाही, असा हल्लाबोल दमानियांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर आता धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय. दमानियांचे आरोप खोटे आहेत असा पलटवार मुंडेंनी केलाय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सविस्तर पोस्ट शेयर करत मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळून लावलेत..