• Sat. Sep 5th, 2026
मस्साजोगच्या ग्रामस्थांची आक्रमक भूमिका, थेट मोठा इशारा, गृहमंत्री, मुख्यमंत्री कोणीही असो…

Authored byशितल मुंढे | Contributed by दीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Feb 2025, 9:20 pm

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. आता हत्येनंतर गावकऱ्यांनी बैठक घेतली आहे. ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. थेट सरकारला मोठा इशाराच देण्यात आलाय. आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे तर इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक जाधव, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. आज मस्साजोगच्या ग्रामस्थांनी एक महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सरकारला मोठा इशाराच दिल्याचे बघायला मिळतंय. गृहमंत्र्यांना एक निवेदन तयार करू, त्यावरती गृहमंत्री काय उत्तर देतात. त्यावरती आठ दिवसांची मुदत त्यांना देऊ आणि त्यानंतर आपण आंदोलन करू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आवादा कंपनीची भूमिका अद्यापपर्यंत समोर आलेली नाही, ती भूमिका देखील समोर आली पाहिजे. खंडणी प्रकरणात त्यांनी पण पुरावे प्रशासनाला दिले पाहिजेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीये.

गृहमंत्री मुख्यमंत्री कोणीही असो आम्ही मागे सरकणार नाही, असा थेट इशारा देण्यात आलाय. कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला मुदत देण्यात आलीये. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यासंदर्भात आक्रमक आंदोलन करू, असे ग्रामस्थांनी बैठकीत म्हटले. सीडीआर संदर्भात तपास योग्य पद्धतीने झाला आहे का? याची देखील माहिती मिळाली पाहिजे. आरोपीवर वरदहस्त कोणाचा सिडीआर संदर्भात गृहमंत्र्याला निवेदन देणार.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होतीया बैठकीवेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, तपास यंत्रणांवर गैर विश्वास दाखवून चालणार नाही. सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. हत्या झाल्यापासून आठ दिवसात काय काय प्रकार घडले याची सविस्तर माहिती मागवणार आहोत. गावातील दहा व्यक्तींची कमिटी तयार करून या तपासावर लक्ष ठेवू. आपल्यामध्ये समन्वय राहील असं करू.

आपला माणूस गेला आहे, आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सुप्रियाताईंना उद्या कोणत्या मागण्या द्यायच्या या संदर्भातील निवेदन तयार करू. आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीची न्याय मिळावा ही भावना आहे. त्याची जाणीव आहे. तुम्ही मला पोरक करू नका. धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. आपण सर्व गरीब माणसे आहोत. तुम्ही असा कधी संकोच बाळगू नका मला बोलण्यासंदर्भात, असेही धनंजय देशमुखांनी म्हटले आहे.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed