मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. आता हत्येनंतर गावकऱ्यांनी बैठक घेतली आहे. ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. थेट सरकारला मोठा इशाराच देण्यात आलाय. आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे तर इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे.
गृहमंत्री मुख्यमंत्री कोणीही असो आम्ही मागे सरकणार नाही, असा थेट इशारा देण्यात आलाय. कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला मुदत देण्यात आलीये. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यासंदर्भात आक्रमक आंदोलन करू, असे ग्रामस्थांनी बैठकीत म्हटले. सीडीआर संदर्भात तपास योग्य पद्धतीने झाला आहे का? याची देखील माहिती मिळाली पाहिजे. आरोपीवर वरदहस्त कोणाचा सिडीआर संदर्भात गृहमंत्र्याला निवेदन देणार.
खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, माझी सुरेश धस यांच्याकडून मोठी अपेक्षा होतीया बैठकीवेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, तपास यंत्रणांवर गैर विश्वास दाखवून चालणार नाही. सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. हत्या झाल्यापासून आठ दिवसात काय काय प्रकार घडले याची सविस्तर माहिती मागवणार आहोत. गावातील दहा व्यक्तींची कमिटी तयार करून या तपासावर लक्ष ठेवू. आपल्यामध्ये समन्वय राहील असं करू.
आपला माणूस गेला आहे, आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सुप्रियाताईंना उद्या कोणत्या मागण्या द्यायच्या या संदर्भातील निवेदन तयार करू. आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीची न्याय मिळावा ही भावना आहे. त्याची जाणीव आहे. तुम्ही मला पोरक करू नका. धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. आपण सर्व गरीब माणसे आहोत. तुम्ही असा कधी संकोच बाळगू नका मला बोलण्यासंदर्भात, असेही धनंजय देशमुखांनी म्हटले आहे.

