• Fri. Mar 13th, 2026

    राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे पाऊल उचलताच जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा

    राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबद्दल मोठे पाऊल उचलताच जितेंद्र आव्हाडांनी दिला थेट इशारा

    लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या कुटुंबातील महिलांना आता वगळले जाणार आहे. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते. सरकारकडून यासाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. सरकारवर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केलीये.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता वगळले जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार हे स्पष्ट आहे. यासोबतच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे राज्यात जवळपास 2 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. आता तो आकडा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

    मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना आता बंद होणार. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते की, ही योजना बंद होणार नाहीये. आता लाडक्या बहिणींचे उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत सरकार घेणार असल्याचे कळताच अनेकांनी यावर टीका केलीये. निवडणुकीच्या अगोदर काही गोष्टींची पडताळणी न करताच महिलांना पैसे देण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये.
    लाडक्या बहिणींना धक्का देणारी बातमी, राज्य सरकारचं मोठं पाऊल, निकषांत न बसणाऱ्या…जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता जर त्यांची नावं कापणार असतील तर मत घेऊन हे करत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की, तुम्ही लाच घेण्याचाच प्रकार करत आहात. जर नावं कापली जाणार असतील तर त्यावर शिक्कामोर्तब होईल की, मतांसाठी लाच दिली. मते घेतली, सरकार आले, सत्ता आली. आता महिलांना घरी पाठवा. पण आम्ही सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू. केबिनमध्ये आम्ही महिलांना बसू.

    मंत्र्यांचे जीने मुस्कील करू. अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार. पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, म्हणजे तुम्ही आमच्या महिला बघिनींना फसवले खोटी आश्वासने देऊन. आता पळ कशाला काढत आहात. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामधील सर्वात महत्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनेक महिलांनी उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत नसताना देखील अर्ज केली होती.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed