Nana Patole: शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
‘भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, पण सरकार एक रुपयात पीकविमा देते’, अशाप्रकारचे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. त्यावर, पीकविम्याचे पैसे कोकाटे त्यांच्या खिशातून जात नसल्याचा पलटवार पटोले यांनी केला. ‘सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही, कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन महायुतीने मतांची भीक मागितली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भीक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते’, अशी टीका त्यांनी केली.
एअरगनशी मस्ती, अशोक सराफ यांच्या इमारतीला गोळी धडकली, ओशिवऱ्यात काय घडलं?‘सरकारच्या पीकविमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी’, अशी मागणी पटोले यांनी केली.

