Authored byमानसी देवकर | Contributed byअमोल सराफ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम15 Feb 2025, 8:24 am
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झालाय. भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, असे कोकाटे म्हणाले. कोकाटेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात चांगलेच पडसाद उमटले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषिमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मदत करू शकत नसाल तर शेतकऱ्यांच्या भावना दुखावू नका, असे तुपकर म्हणाले.