Sanjay Raut on Sharad Pawar :एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना फोडली नसती, तर अजित पवारही फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं, त्यामुळे मी जी भूमिका मांडली, ती शरद पवारांचीही असायला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
“मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली, आम्हाला हे मान्य नाही. एका गद्दाराला, ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला, कारण एकनाथ शिंदेंनी जर शिवसेना फोडली नसती, तर अजित पवारही फुटले नसते आणि सरकार पडलं नसतं, त्यामुळे मी जी भूमिका मांडली, ती शरद पवारांचीही असायला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.
“एकनाथ शिंदे हा माणूस… त्यांनी अमित शहांसोबत हातमिळवणी करुन पक्ष फोडलेत, अमित शाहांनी पक्ष फोडले.. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील. आणि तुम्ही त्यांची भलामण करता.. मी बोललो.. कारण माझ्यात हिंमत आहे. तुम्ही अमित शहांविषयी काही बोलताय का? त्यांनी पवारांवर टीका केली. नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतात शरद पवारांना, तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही.” असंही राऊत म्हणाले.
Sanjay Raut : पवारांनी शिंदेंना पुरस्कार देणं महाराष्ट्राला रुचलं नाही, मी बोललो, कारण माझ्यात हिंमत आहे! संजय राऊत पुन्हा कडाडले
“हे ढोंगी, भंपक लोक आहेत, डर्टी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रात. हे दुतोंडी गांडूळ आहेत. मला अजिबात कसलीही पोटदुखी नाही, एकनाथ शिंदेंना नोबेल पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींनी. परमबीर चक्र द्यावं, माझा आक्षेप हाच की महादजी शिंदेंसारखा शूर योद्धा, ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत. दिल्लीपुढे झुकला नाही, त्यांच्या नावाचा पुरस्कार कुठली खासगी संस्था देते आणि त्याचा एवढा गवगवा. एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार देणं हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे.” असं संजय राऊत म्हणाले.
Tukaram Birkad : गो तस्करांच्या गाडीची जोरदार धडक, अजितदादांच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर
“शरद पवारांनी तिथे जाणं महाराष्ट्रालाच काय त्यांच्या पक्षातील लोकांनाही रुचलेलं नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांना लोकं घेऊन जातात, त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला की त्याला मोठा मान मिळतो. पण कोणता पुरस्कार कोणाला द्यावा. भारतरत्न द्या, फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण द्या. प्रश्न महादजी शिंदेंसारखा शूर मराठी योद्धा ज्याने दिल्लीचं तख्त तलवारीच्या जोरावर आपल्या हातात ठेवलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार कोणाला देताय, दिल्लीपुढे झुकले-वाकले, महाराष्ट्राशी गद्दारी केली त्यांना.” असा सवाल राऊतांनी विचारला.
Nashik Politics : इथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलले, तिथे बड्या नेत्यांनी ‘हात’ सोडला, मोठे उलटफेर
हम जहाँ खडे होते है, लाईन वही से शुरु होती है, असा डायलॉग एकनाथ शिंदेंनी सुनावल्यावरुन राऊत म्हणाले, की सिनेमातले डायलॉग मला सांगू नका, दिवारमधले डायलॉग.. लिहून दिलेलं वाचता.. यांच्यामध्ये तंगड्यात तंगड्या घालण्याचं काम सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी मला शहाणपणा शिकवू नये, काय केलं पाहिजे नि काय नाही. ते कोणे एके काळी माझे घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते. त्यांनी त्यांची लाईन कोणाकडे मारायची तिथे मारावी, जे सरकार गद्दारीतून निर्माण झालं, त्याचे ते प्रमुख आहेत. तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणाने नाही, तर पैशाच्या जोरावर जिंकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला.

