Authored byमानसी देवकर | Contributed byजितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम14 Feb 2025, 10:09 am
काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मत मांडलं. प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणी तयार होत नाही, दिग्गज पळून गेले, असा खोचक टोला त्यांनी लगावला. हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर होण्यापूर्वी विखेंनी ही प्रतिक्रिया दिली होती. दिग्गजांना डावलल्याचा आरोप योग्य नाही, सर्व दिग्गज पळालेत, असे विखे म्हणाले. आगामी काळात काँग्रेसची अवस्था अजून बिकट होईल, असे विधानही विखेंनी केले.