Ladki Bahin Yojana: सरकारने पाच लाख बहिणींना अपात्र केले असून आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता आहे. ही कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी गद्दारी आहे,’ अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.
लाडकी बहीण योजनेतून महिन्याभरात पाच लाखलाभार्थी अपात्र ठरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पटोले यांनी ही टीका केली. ‘ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीत माताभगिनींची मते मिळवण्यासाठी होती, निवडणुकीनंतर भाजपा युती त्यांचे खरे रंग दाखवले असे आम्ही सातत्याने बजावले होते आणि शेवटी महायुतीच्या भावांनी लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो माताभगिनींची फसवणूक केली आहे,’ असे पटोले म्हणाले.
मी तर एक फाटका माणूस! राजाभाऊ वाजेंनी फेटाळले ‘ऑपरेशन टायगर’चे वृत्त, नेमकं काय म्हणाले?
‘विधानसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तेच राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने सांगितले आहे. यात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या? भाजपने निवडणूक आयोगाचे वकीलपत्र घेतले आहे का? निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे,’ असे पटोले म्हणाले.
गौतम अदानींचं मोठं मन; लेकाचं लग्न साधेपणाने करुन केलं कोट्यवधींचं दान, आकडा वाचून शॉक व्हाल!
निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया आता हाती घेण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात १० लाख ६० हजार ७०१ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला . मात्र, घरी कार असणाऱ्यांची आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांची यादी आता प्रशासनाकडे प्राप्त झाली असून त्यांची नावेही लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येत आहेत .

