• Sun. Jun 14th, 2026

    माझी लाडाची पिनू… आमच्या नवरीबाई… २० फेब्रुवारीला लग्न; शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी शेवटचे शब्द

    माझी लाडाची पिनू… आमच्या नवरीबाई… २० फेब्रुवारीला लग्न; शिरीष महाराज मोरेंचे होणाऱ्या पत्नीसाठी शेवटचे शब्द

    Pune Shirish Maharaj More News : पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळू जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी काही पत्र लिहिली होतीत, त्यामध्ये होणाऱ्या पत्नीसाठीही मोरे यांनी वेगळे पत्र लिहित माफी मागितली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी बुधावारी सकाळी राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. शिरीष मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून इतका टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोरे यांनी काही पत्र लिहून ठेवली होतीत, ज्यामध्ये आई वडिल, बहिण आणि त्यांच्या मित्र मंडळींसाठी लिहिली आहेत. येत्या २० फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता. १५ दिवस बाकी असताना त्यांनी स्वत:ला संपवलं. यामधील एक पत्र त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी लिहिले असून त्यामध्ये त्यांनी माफी मागितली आहे.

    शिरीष महाराज मोरे काय म्हणाले?

    खरंतर तुझा आता कुठे हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती न मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागलो मला माफ कर. आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा. तुला न्याय नाही देऊ शकतो. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहण्याऱ्या माझ्या सखे माझ्या चांगले वेळेची हकदार होतीस तू. माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय, असं शिरीष महाराज मोरे म्हणाले.

    कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारतदर्शन राहिलं. सगळंच तर राहीलं. मी काहीही न देता सुद्धा माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. खूप गोड आहेस तू. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल पण जप स्वत:ला एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट, आता work from home हो, खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर तुझाच अहो शिरीष मोरे. आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त करून मी चाललो आहे. खूप गोड आहे प्रियांका, तिला कधी वेळच देता आला नाही. परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा. नाहीतर ती लग्न करणार नाही, अशी विनंतीही पत्रात शिरीष मोरे यांनी मित्रांना केली आहे.

    Shirish Maharaj More Note

    प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय… खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणे चूकच. पण कृपा करुन आई-वडिलांना सांभाळा. दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय. त्याची सारी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करुन आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल, पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा, असं मोरेंनी पत्रात म्हटलंय.

    ‘यु्द्ध हरलो, मला माफ करा,’ असे म्हणत आई-वडील, मित्र आणि होणारी पत्नी यांच्या नावाने शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या (सुसाइड नोट) समोर आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून त्यांनी सर्वांचीच माफी मागितली आहे. शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील राहत होते; तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत गेले. मात्र, बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दार तोडून पाहिले असता, त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते. ते संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते. तसेच ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते. त्यांनी राज्य आणि देशभर प्रवास करून हिंदुत्वाचा प्रसार करण्याचे काम केले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed