• Mon. Mar 9th, 2026
    तो एक पुरावा, ज्याने हत्येचं गूढ उकलणार?, धनंजय देशमुख यांची मोठी मागणी काय?

    Dhanajay Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होतील. मात्र, अजूनही आरोपींना काही शिक्षा होत नाहीये. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधासाठी आरोपींची पुन्हा रिमांड घेण्याची मागणी आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता तपास कुठेतरी थांबल्यासारखा वाटत आहे. कारण आता जवळपा दोन महिने झाले तरीही फरार आरोप कृष्णा आंधळे याला पकडण्याच पोलीस यंत्रणांना यश आलेलं दिसत नाही. तर दुसरीकडे ज्या आरोपींना हत्या केली त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. मात्र कोणतीही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराडा आतमध्ये असून त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विष्णु चाटे याचा मोबाईलही अजून मिळालेला नाही. सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हाच महत्त्वाचा पुरावा असलेल्या मोबाईलच्या शोधासाठी पुन्हा एकदा रिमांड घेण्यत यावी अशी मागणी केली आहे.

    धनंजय देशमुख काय म्हणाले?

    विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

    विष्णू चाटेचा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    दरम्यान, संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. बीडमधील आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरत यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा आणि एकदम खास वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला. कराडला या अवादा कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करून अटक केली गेलीय. मात्र अद्यापही मयत सरपंच देशमुख यांचे कुटंबिया न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed