Produced byविश्रांती शिंदे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम3 Feb 2025, 7:53 pm
माघ वारी निमित्ताने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंडीना….एकत्रित करून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने सोलापूर शहरात….भव्य गोल रिंगण सोहळा सोमवारी सायंकाळी संपन्न झाला आहे.दिंडीची सुरुवात वैष्णव पताकाने होते. पहिले रिंगण ध्वजाधारी भाविकांचे झाले. तुळशी वृंदावनधारी महिला आणि मृदंगाचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी रिंगण केले. शेवटी अश्व रिंगण करण्यासाठी कर्नाटक राज्यातील अंकली गावातून आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आले होते. महिला व पुरुष वारकरी भाविकांनी उत्साहाने पाऊल, फुगडी खेळ केले. अश्व रिंगण सुरु होताच भाविकांमध्ये चैतन्य संचारले, सर्व वातावरण पंढरीमय झाले.