• Sun. Jun 7th, 2026
    शक्तिपीठ महामार्गाला एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्गार; पण परिस्थिती काही वेगळीच

    CM Devendra Fadnavis : शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमधील शेतकऱ्यांकडून विरोध सुरु आहे. एक इंच ही जागा देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. असे असताना राज्यातील एकाही शेतकऱ्याचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमधील शेतकऱ्यांकडून विरोध सुरु आहे. एक इंच ही जागा देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. असे असताना राज्यातील एकाही शेतकऱ्याचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हदगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी आताच आमदारांसोबत चर्चा केली. आमदारांनी सांगितलं शक्तिपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही. आमदार कृती समितीला घेऊन चर्चासाठी येणार आहेत. कृती समिती पण सांगेल आमचा विरोध नाही.’ नांदेड जिल्ह्यात महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

    माओवाद्यांना मुख्यमंत्र्याचा इशारा

    गडचिरोलीमध्ये पोलिसांचा खबरी असल्याच्या कारणावरून एका माजी सभापतीची माओवाद्याकडून हत्या करण्यात आली. हे कोणी केले, याचा अंदाज येतो. आज गडचिरोलीमध्ये माओवादी निराश झाले आहेत. सातत्याने सरेंडर करत आहेत. जे सरेंडर करत नाहीत ते निष्क्रिय होत आहेत. शेवटच्या घटकापर्यंत माओवाद पोसतोय. त्यामुळे माओवादी निराश होतोय. त्या निराशेतून केलेली हत्या दिसते. ज्यांनी हे केलं त्यांच्यावर महिनाभरात कारवाई होईल, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले.

    विरोधकांना बजेट समजले नाही

    रेल्वेसाठी महाराष्ट्रात जे बजेट दिले, त्यात अर्बन सेवेसाठी दोन हजार कोटी आणि बुलेट ट्रेनसाठी साडेचार हजार कोटी दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्राला हा निधी मिळतो. बुलेट ट्रेनसाठी फक्त हा कंन्स्ट्रक्शनचा निधी आहे. त्यामुळे तो चार हजार कोटी आहे. मला असे वाटते, थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर, या गोष्टी समजू शकतात. विरोधकांना बजेट समजले नाही, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

    परधर्मियांनी केलेले अतिक्रमण हटवणार

    राज्यात अनेक ठिकाणी परधर्मीयांनी अतिक्रमन केले आहे, हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कारवाई करुन हटवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाच वर्षात महानुपंताच्या प्रमुख स्थळाचा विकास करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. मला जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे. माझ्या कामामुळे जनतेमधील प्रेम अटणार नाही अस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed