• Sun. Mar 15th, 2026
    परस्त्रीचा मोह झाला,प्रेमविवाह केलेल्या पतीला आपल्या पत्नीचाच विसर पडला, अखेरीस….

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Jan 2025, 10:19 am

    Raigad Crime News : पती किंवा पत्नी घरी नसल्याची संधी साधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटीपर्यंतचा हा प्रवास शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातील कुणालाही प्रेमसंबंधाची कुणकुणही लागू न देण्याची खबरदारी महिला व पुरुष घेत असतो. मात्र, अशी वेळ येते की, त्यावेळी याचा परिणाम थेट संसारावर पडायला लागतो. पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागते. तेव्हापासून निट असलेल्या संसाराचा गाडा रूळावरून खाली उतरायला लागतो. परिणामतः घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंचारापर्यंत विवाहबाह्य संबंध पोहोचतात

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन, रायगड : क्षणिक सुखासाठी विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परस्त्री ही सुखी संसाराच्या मध्ये आल्याने रायगड जिल्ह्यातील दहिवली येथील संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ठेपला आहे.

    रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहीवली येथे व्यवसायाने विधी तज्ञ असलेली निलम उमेश चौधरी (वय २९ वर्ष, व्यवसाय वकील, रा विनायक अपार्टमेन्ट प्लॅट नं.३०२ सुयोगनगर दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड मुळ रा. देवपाडा जामसंग, ता. कर्जत, जि. रायगड) हीचा १४ ऑक्टोंबर २०१३ रोजी उमेश महादु चौधरी,( वय ३६ वर्ष रा ललानी रोड ता कर्जत जि रायगड मुळ रा पोखरकरवाडी कशेळे ता कर्जत जि रायगड ) यांच्याशी प्रेमविवाह झाला होता.या विवाहितांना एक मुलगी देखील आहे. प्रेम विवाहाची सुरवातीची सात वर्षे ही सुख समृध्दीत गेली.
    मात्र नंतर या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागल्यासारखे झाले.

    या दाम्पत्यांमध्ये परस्त्री आल्याने भांडणे होऊ लागली. परस्त्री आपली मैत्रीण आहे आणि तीदेखील याच घरात राहणार असे पतीने सांगितले. तर, त्या परस्रीला घरात ठेवण्याला विवाहित पत्नीने विरोध केला असता पती उमेश चौधरी यांनी नीलम हिस जेवण बनवता येत नाही, शिळं जेवण देते, मी तुझ्या सोबत राहणार नाही, तुला नांदवणार नाही, असे घालुन पाडुन बोलुन शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या वडीलांकडुन घर घेण्यासाठी ४ ते ५ लाख रूपये घेवुन ये, असा तगादा नीलम हिच्या पाठी लावला.

    नीलम हिच्या वडिलांनी घर घेण्यासाठी चार लाख पन्नास हजार रुपये दिले होते. असे असताना देखील पती उमेश हा नेहमी पत्नी नीलम हिस सांगायचा की, मी तुला या घरात राहु देणार नाही. तुझ्या आई वडीलांनी मला घर घेण्यासाठी कमी पैसे दिले आहेत. असे बोलुन निलम व त्यांची मुलगी यांना घाणेरडया भाषेत शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करून, शारीरीक व मानसीक छळ केला आहे.

    याबाबत नीलम उमेश चौधरी हीने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कर्जत पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं.०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८५, ११५(२),३५२,३५१(२) (३).ग नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस नाईक घोलप या करीत आहेत.

    पती किंवा पत्नी घरी नसल्याची संधी साधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटीपर्यंतचा हा प्रवास शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातील कुणालाही प्रेमसंबंधाची कुणकुणही लागू न देण्याची खबरदारी महिला व पुरुष घेत असतो. मात्र, अशी वेळ येते की, त्यावेळी याचा परिणाम थेट संसारावर पडायला लागतो. पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागते. तेव्हापासून निट असलेल्या संसाराचा गाडा रूळावरून खाली उतरायला लागतो. परिणामतः घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंचारापर्यंत विवाहबाह्य संबंध पोहोचतात

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed