Ladki Bhahin Yojana News: ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना विविध निकष निश्चित करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळून सरकार पुन्हा स्थापन झाले. पुन्हा सत्तेत आल्यानंतर योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांचे एकवीसशे होणार की पंधराशेही जाणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
हायलाइट्स:
- अर्ज छाननीवरून ‘लाडक्या बहिणी’ संभ्रमात
- प्रशासनाला अर्ज तपासणीचे आदेश नाहीत; योजना चर्चेत
- एकवीसशे होणार, की पंधराशेही जाणार?
एकवीसशे होणार, की पंधराशेही जाणार?
‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना विविध निकष निश्चित करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळून सरकार पुन्हा स्थापन झाले. पुन्हा सत्तेत आल्यानंतर योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांचे एकवीसशे होणार की पंधराशेही जाणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
