राज्यातील शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलीय. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. कर्जमाफीच्या घोषणेवरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतमालाला हमीभाव पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याबाबत राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सरकारला घोडेबाजारची चटक लागल्याचे विधान त्यांनी केले. सरकारला घोडेबाजाराचा छंद लागला आहे, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.