• Mon. Mar 9th, 2026

    Konkan Ro-Ro Ferry: ‘मुंबई-विजयदुर्ग रो रो’नंतर जलमार्गांचा विस्तार; दोन नवे थांबे, नेरूळ-मुंबई सेवेमुळे अनेक भागांना जोडणी

    Konkan Ro-Ro Ferry: ‘मुंबई-विजयदुर्ग रो रो’नंतर जलमार्गांचा विस्तार; दोन नवे थांबे, नेरूळ-मुंबई सेवेमुळे अनेक भागांना जोडणी

    Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू झाली आहे. त्यानंतर या मार्गावर दोन नवे थांबे सुरू होणार आहेत. शिवाय नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सेवेलाही चालना मिळणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला नुकतीच सुरुवात झाली असून या मार्गावरील आता इतर दोन थांब्यांसाठी सागरी महामंडळाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यानुसार जयगड आणि वेंगुर्ला या जेट्टीचे काम येत्या महिनाभरात पूर्ण केले जाणार असून हे दोनही थांबे त्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. मुंबई ते विजयदुर्ग या रोरो सेवेबरोबरच नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सेवाही सागरी महामंडळामार्फत लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

    मार्गावरील दोन थांबे सुरू करण्याची मागणी

    महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला नुकताच हिरवा कंदील दर्शविण्यात आला होता. मंत्री नितेश राणे यांनी या रोरो सेवेचा शुभारंभ केल्यानंतर आता विजयदुर्गसोबत या मार्गावरील इतरही दोन थांबे त्वरीत सुरू करण्याची मागणी कोकणवासीयांकडून करण्यात येत आहे. त्याबरोबरच या रोरो सेवेतील तिकीट दर अधिक असून ते कमी करण्याची मागणीही प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे. जयगड येथे औद्योगिक व बंदरविकासाच्या दृष्टीने हा थांबा महत्त्वाचा मानला जात आहे.Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश

    प्रवाशांच्ये वेळेची बचत होणार

    वेंगुर्ला थांब्यांमुळे मालवण, तारकर्ली, आचरा परिसरातील पर्यटनस्थळांना सुलभ संपर्क मिळणार आहे. वाहनांसह प्रवासाची सोय उपलब्ध असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. या जेट्टींवरील तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून सुरक्षा व परवानगी प्रक्रियेनंतर नियमित वेळापत्रक जाहीर केले जाईल. नव्या थांब्यांमुळे मुंबई–कोकण जलवाहतूक सेवेचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Maharashtra TimesMumbai Water Cut: मुंबईत 24 तास पाणीपुरवठा बंद! गोरेगावमधील अनेक भागांमध्ये परिणाम; लिंक रोडच्या कामांमुळे फटका

    ‘कोकण किनारपट्टीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या जलवाहतुकीच्या नव्या पर्यायामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा उद्देश असून या वाहतूक सेवेमुळे चाकरमन्यांच्या वेळेतही बचत होणार आहे. नव्या जेट्टी कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागांना थेट जलमार्गे जोडणी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय तसेच स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल’, अशी पेक्षा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा