• Sat. Sep 12th, 2026
Explainer : अभिनेते गोविंदा शिवसेनेत, मात्र पुन्हा खासदार झाल्यास एकनाथ शिंदेंना किती फायदा?

मुंबई : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ फार महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र कुणाला उमेदवारी द्यायची यावरून खलबतं सुरू होती. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनाच उमेदवारी द्यायची की नाही यावरून शिंदेंच्या शिवसेनेत मात्र बराच खल पहायला मिळाला. मात्र त्यांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अभिनेते गोविंदा यांनी मध्यरात्री एक वाजता दक्षिण मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानावर येत मुख्यमंत्र्यांसोबत ‘मन की बात’ सुरू केली. महायुतीतील तिन्ही नेत्यांचे ‘जिंकून येणं’ हा एकमेव निकष असल्यावर एकमत झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा यांच्याकडे विचारणा करण्यात आली. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे वयोमान बघता त्यांना या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती देता येत नाही. गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तिकर ही लढत किती चुरशीची होईल याबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका होती. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. म्हणून शिवसेना शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार शोधण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

सिनेतारकांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ

मुंबईतील उत्तर पश्चिम हा मतदारसंघ सिनेतारकांचे वर्चस्व असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. बॉलिवूडची फिल्मसिटी पण याच मतदारसंघात येते. १९७७ आणि १९८० च्या निवडणुकीत जनता दलाने ही जागा जिंकली होती. पक्षाचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी दोनदा खासदार झाले. १९८४ मध्ये चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी काँग्रेस पक्षाकडून ही जागा लढवली होती. त्यांनी १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये सलग तीन वेळा येथून निवडणूक जिंकली. १९९६ च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली आणि पक्षाचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. १९९८ च्या निवडणुकीतही या जागेवर शिवसेनेचे मधुकर सरपोतदार परत निवडून आले होते.
सात खासदारांना ‘तिकीट’दिलासा, एकाचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या लेकासह चौघे विद्यमान गॅसवर
२००४ वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा विक्रमी मतांनी अभिनेता गोविंदा यांनी पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी गोविंदांना हेरलं. गोविंदा यांची लोकप्रियता पाहून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात तेच ‘हिरो नंबर १’ ठरतील असा विश्वास शिंदेंना वाटत आहे.
श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’
सिनेतारकांचा या मतदारसंघावरील प्रभाव असल्यामुळे ऐनवेळी गोविंदांना शिवसेनेत पक्षप्रवेश करून शिंदेंनी एक प्रकारे त्यांची उमेदवारी पक्की केली आहे असं म्हणायला हरकत नाही.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

जरी गोविंदांना शिंदेंनी उमेदवारी दिली तरी २००४ ची त्यांची लोकप्रियता ओसरलेली दिसते आहे. त्यामुळे त्यांची निवडून येण्याची पण शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर गोविंदाचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश नेमका किती फायद्याचा होईल, हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed