ठाणे : ठाणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून ६० वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या बुधवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी १० वा. सॅटिस पूल, ठाणे रेल्वे स्टेशन येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे तसेच परिवहन समिती सदस्य व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News
सुरक्षित महिला, सक्षम महिला या घोषनेनुसार अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद केली आहे. तरी परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व आसनांची व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
सुरक्षित महिला, सक्षम महिला या घोषनेनुसार अर्थसंकल्पात नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद केली आहे. तरी परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व आसनांची व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
एसटीमध्ये सवलतीचा महिलांना लाभ
राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासभाड्यात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्यात एसटीमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. महिला प्रवाशांची संख्या वाढल्यानं परिणामी एसटीला देखील त्याचा फायदा झाल्याचं चित्र आहे. आता एसटी प्रमाणं ठाण्यातील महिलांना देखील टीएमसीच्या बसेसमध्ये प्रवास करताना ५० टक्के सवलत मिळणार आहे.
