• Wed. Jul 29th, 2026
    भाजप १२ विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार? मंत्री कपिल पाटील म्हणाले…

    अर्जून राठोड, नांदेड : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी प्रवेश केला तर त्याचा फायदाच होतो. मी स्वतः राष्ट्रवादी मधून भाजपात आलो आहे. तेव्हा भाजपाला माझा फायदाच झाला आहे. अशोक चव्हाण हे भाजपात आले आहेत. त्यांचा नांदेडमध्ये भाजपाला फायदाच होणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली.

    विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील भाजपाच्या १२ खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आहे. यावर कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
    मोदींच्या नावेच शिंदे-पवारांचे खासदार निवडून येणारेत, विनाकारण जास्त जागा का? संघाची आडकाठी?

    राज्याची कोअर कमिटी ही केंद्राच्या कोअर कमिटीला अहवाल देत असते. त्यावर निर्णय होत असतो. यावर संभाव्य उमेदवार कोण हे कोणीच सांगू शकत नाही असं पाटील म्हणाले. नांदेड लोकसभेचा उमेदवार कोण यावर देखील कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. नांदेड असो की देशातील लोकसभेच्या ५४३ जागांवर नरेंद्र मोदी हेच उमेदवार असतील असे मिश्किल उत्तर कपिल पाटील यांनी दिले.
    पंधरा विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात, भाजपच्या ३२ संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल

    मी इथे उमेदवार ठरवण्यासाठी आलो नाही. उमेदवार ठरवण्याचे अधिकार मला नाहीत. सर्व अधिकार हे केंद्रीय कमिटीला आहेत. त्याचे प्रमुख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आहेत. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संभाव्य उमेदवार कोण याची माहिती दिली जाईल,असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील सांगितले.

    शिंदेंसोबतच्या १३ खासदारांना उमेदवारी मिळणार, अधिकचे उमेदवारही मिळतील; मंडलिकांना विश्वास

    भाजपचे सर्वाधिक खासदार असावेत, संघाच्या आक्षेपांमुळे जागावाटप रखडले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सर्वाधिक पसंती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांपैकी काही खासदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यात भाजपच्या नाकीनऊ येईल. अशावेळी या जागा धोक्यात आणण्यापेक्षा तिथे भाजपच्याच उमेदवारांना उभे केल्यास त्या जागा निवडून आणणे सोपं जाईल पर्यायाने मोदींसोबत सर्वाधिक खासदार संसदेत पोहोचतील, असा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मांडण्यात आल्याचे समजते. यामुळेच जागावाटप लांबणीवर पडल्याचे कळते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed