• Sat. Sep 21st, 2024
प्रस्तावित तारळी हायड्रो पॉवर प्रोजेक्टला विरोध, दीड लाख जनतेवर परिणाम: देवराज पाटील

सातारा : तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्पामुळे तारळी जलाशय नदीचे पाणी प्रदूषित होणार असल्याने हे अंतिमत: शेती व स्थानिक जनतेवर घातक परिणाम करणारे ठरेल. त्यामुळे वेळीच जागे होऊन सर्वांनी आपापले पक्षीय भेद बाजूला सारून यास विरोध करणे गरजेचे आहे. हा कोण्या एकट्या दुकट्याचा लढा नाही. मुरुडपासून उंब्रजपर्यंत तारळे खोऱ्यातील दीड लाख जनतेवर परिणाम करणारा असल्याने हा सार्वजनिक आहे. त्यामुळे सर्वांनी गट तट विसरून एकत्र या, असे आवाहन कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी केले.यावेळी बाळासाहेब सपकाळ, सदाभाऊ जाधव, भास्करराव गोरे, उद्धवराव फाळके, बाळासाहेब राजेमहाडिक, नानासाहेब पन्हाळकर, अभिजित जाधव, नवनाथ जाधव, सुहास माने, अ‍ॅड. चेतन कणसे, अ‍ॅड. सिद्धेश पवार, विश्वास पवार, भरत जाधव, सुहास पाटील आदी मान्यवरांसह पकल्प विरोधी समितीचे सदस्य व तारळे खोऱ्यातील विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

देवराज पाटील म्हणाले, पाटण तालुक्यातील डांगीस्तेवाडी गावात उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीचा तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट १५०० मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्प नेमका कसा आहे, काय आहे हे समजून घेतल्यावर तो स्थानिक जनतेच्या मुळावर येणार हे दिसत आहे. तो साकारताना पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होणार आहे. वृक्षतोड संभावित आहे. याचा पशुपक्षी वन्यप्राण्यांवर देखील परिणाम होणार आहे. तारळी धरणाचे पाणीवाटप पूर्वीच झाले आहे. मग नव्याने खासगी कंपनीला पाणी कसे काय देणार? आमच्या हक्काचे पाणी काढून खासगी उद्योजकांच्या घशात घालणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असं देवराज पाटील म्हणाले.
घरात लग्नाला विभक्त कुटुंबही एक होतं; मतभेद असले तरी चर्चेने सोडवू, चंद्रकांतदादांचं स्पष्टीकरण
ॲड. चेतन कणसे व सिद्धेश पवार यांनी प्रकल्पाबाबत सांगितले, की मोठ्या अदृश्य शक्ती कशा कार्यरत आहेत याचे स्पष्टीकरण दिले. कळंबे, ता. पाटण येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे. पहिले ध्येय हे पर्यावरणीय जनसुनावणी आहे. तिथे केवळ पर्यावरणीय हरकतीच ऐकून घेतल्या जातील ते सोडून कोणताही फाफट पसारा मांडण्याची सांगण्याची गरज नसल्याचे सांगितले. लोकांना अंधारात ठेवून हा प्रकल्प नियोजित केला आहे. वरिष्ठ पातळीवरून मोठे सहकार्य असल्याने केवळ रस्त्यावर उतरून यश मिळणार नाही, तर न्यायालयातही न्याय मागावा लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटीशन लवकरात लवकर दाखल करणे गरजेचे आहे. हा लढा रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने लढावा लागणार असल्याची जाणीव दोन्हीही वकिलांनी करून दिली.
Read Latest Maharashtra News And Marathi News

सरकार नेहमीच हे उद्योगधार्जिणे असते. त्यामुळे सरकार दरबारी गाऱ्हाणं मांडून पण फायदा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आंदोलन व न्यायालयीन लढा हाच पर्याय उरतो. आपल्याला दोन्हीही मार्गाचा अवलंब करावा लागेल. कायदेशीर लढ्यावर बारकाईने काम करावे लागेल, असे स्पष्ट केले.
मविआची मुंबईत बैठक, शरद पवारांच्या डोक्यात साताऱ्याचा बालेकिल्ला, हेलिकॉप्टर पाठवून चार नेत्यांना बोलावलं!
सदाभाऊ जाधव म्हणाले, तारळी धरणाच्या निर्मितीपासून म्हणजे १९९८ पासून तारळे खोऱ्यात संघर्ष सुरू आहे. तो आताही पाठ सोडत नाही. सर्वांच्या सहकार्याने मात्र यावरही मात करूया. यासाठी अभ्यासपूर्ण विरोध गरजेचा आहे. तसेच सर्वांनी कडाडून विरोध केला पाहिजे.

पन्हाळकर म्हणाले, हा लढा म्हणजे हिमालयाला धडका देण्याचा प्रकार आहे. मात्र आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याने आपला राजकीय अभिनिवेश बाजूला सारत सर्वांनी लढ्यात सहभागी व्हावे.
एकमेकांना भेटले, गप्पा झाल्या; पण राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात- माझा आढळरावांना विरोधच
यावेळी यासंदर्भात अनेक विषय चर्चेला आले. लढ्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा उहापोह करण्यात आला. स्ट्रॅटेजी प्लॅन काय असावेत, पर्यावरण जन सुनावणीदरम्यान कार्यपद्धती काय असावी या बाबी ठरविण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed