• Fri. Mar 6th, 2026
    रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार तुमच्या समोर बसलाय, मंत्री केसरकरांकडून नावाची घोषणा

    सिंधुदुर्ग, कुणकेश्वर : शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे. दोन्हीही पक्षाने दावा सांगितलेला असताना महायुतीमधून कोणाला तिकीट मिळते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच मंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान ‘लोकसभेचे उमेदवार तुमच्यासमोर आहेत’ असे म्हणत किरण सामंत यांच्या उमेदवारीची एकप्रकारे घोषणाच केली. इतकंच नाही तर आमच्या मनातलं नाव लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले.

    रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण भैय्या सामंत इच्छुक असून शिवसेना भाजप महायुतीमध्ये आता ही जागा कोणाला जाते हे लवकरच कळेल, असे सांगताना उमेदवार तुमच्या समोर आहे. लोकसभेत त्याला उमेदवारीसाठी यश येऊ दे, अशी प्रार्थना आपण कुणकेश्वरचरणी केल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
    सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचं आहे का? रामदास कदमांचा भाजपला सवाल

    महायुती जेव्हा मजबूत असते त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं, याला फार महत्त्व नसतं. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला आणि तो उमेदवार त्यावेळी निवडून आला. ज्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो. नाहीतर मग युती कशाला म्हणायचं? असंही सूचक वक्तव्य करत किरण सामंत हे लोकसभा निवडणूक भाजप चिन्हावरही लढू शकतात असे संकेतही त्यांनी दिले.
    पंधरा विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात, भाजपच्या ३२ संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल

    उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबाबत बोलतानाही ते म्हणाले की, दादांना कोणीही कमी लेखत नाही. ते एक ज्येष्ठ नेते आहेत. अजितदादांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे तिथे असं काही घडत नाही पण शेवटी एकनाथ शिंदे यांनी जे काही घडवलं, त्याच्यामुळे सत्ता आली ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अजितदादांनी पूर्वीसुद्धा एकदा शपथ घेतली तेव्हाही सत्ता येऊ शकली असती परंतु त्यावेळेला ते घडू शकले नाही. त्यामुळे आत्ता आलेली महायुतीची सत्ता ही एकनाथ शिंदे यांनी जे काही स्वतःचं अस्तित्व दाखवलं त्याच्यामुळेच सत्ता आली, असं केसरकर म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed