मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करणं टाळलं
अरे काही तरी काय विचारता, अरे विषय अधिवेशनाचा विचारा, अधिवेशनात काय घडतंय विचारा, पोडियमवर बोलू असं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक भाष्य न करता निघून गेले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
दादा भुसे यांच्यासोबत बोललो, ते गैरसमज होते, वाद होता असं काही नाही, चर्चा होत असते, त्याला वाद म्हणता येत नाही. दादा भुसे वरिष्ठ मंत्री आहेत, आनंद दिघे यांच्यापासून ते ठाण्याशी संबंधित आहेत. नव्या आमदारांना त्याबाबत माहिती नसेल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. आमदारांना वरिष्ठ मंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करुन द्या, अशी भूमिका होती, असं प्रताप सरनाईक म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अशा घटना घडल्या त्यावेळी संबंधितांना ताकीद दिली असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी असा काही प्रकार घडला नसल्याचं म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांनी लॉबीत देखील पोलीस लावावे लागतील, असं म्हटलं. विधानभवनात हमरीतुमरी होणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं.दरम्यान, महेंद्र थोरवे यांचं काम दादा भुसे यांनी काम न केल्यानं हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
विधानपरिषदेत पडसाद
विधानपरिषदेत विधिमंडळ लॉबीत झालेल्या धक्काबुक्कीचे सभागृहात पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडून माहिती देण्याची मागणी करण्यात आली. यावरुन उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधकांमध्ये चकमक झाली. यानंतर विधानपरिषद सभागृह १ तासासाठी तहकूब करण्यात आलं.
