• Sat. Sep 21st, 2024
अजितदादांच्या भूमिकेची ‘बारामतीकरां’कडून चिरफाड, व्हायरल पत्रावर रोहित पवारांचे बाबा म्हणतात…

बारामती : पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खुलं पत्र लिहित आपण महायुतीत का सहभागी झालो? यामागील भूमिका व्यक्त केली. मात्र आता बारामतीत आणखी एका पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्राला हे उत्तर असल्याचे बोलले जात आहे.

या व्हायरल पत्रामुळे पवार कुटुंबात असणारा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. “बारामतीकरांची भूमिका” अशा शीर्षकाने हे पत्र व्हायरल झाले आहे. या निनावी पत्रात अजित पवारांनी बंड का केले? याचे नेमके कारण मांडण्यात आले आहे. तिसऱ्या पिढीसाठी पार्थ ऐवजी रोहित पवार यांची निवड केल्यापासूनच अजितदादा आणि पवार कुटुंबीयातलं अंतर वाढत गेल्याचा दावा या निनावी पत्रात करण्यात आला आहे.
मोर्चात दिसला नाहीत? अमित ठाकरेंची विचारणा; वसंत मोरे म्हणाले, समजून घ्या, मी नुसता मिरवणारा नाही!!!
ज्यावेळी अप्पासाहेब पवारांचा थेट वारसदार म्हणून तिसऱ्या पिढीतील वारसदार अशी कोणाची निवड करायची, असा प्रश्नचिन्ह उभा राहिल्यावर पार्थ आणि रोहित अशी नावे समोर आली होती. मात्र, आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित यांची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तेव्हापासूनच खरा जळफळाट सुरू झाला होता, असं पत्रात लिहिलं आहे.

फडणवीस अनेक वर्षे विरोधी बाकावर, त्यांच्याकडून थोडं शिका, अजितदादांच्या भूमिकेचा आव्हाडांकडून समाचार

सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या. म्हणून सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की “वाजवा तुतारी गाडा गद्दारी’ असं या निनावी पत्रात म्हटलं आहे. शेवटी पत्रात एक बारामतीकर असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे.

Baramati Ajit Pawar Viral Letter.

बारामतीतील व्हायरल पत्र

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

सद्यस्थितीत अजित पवार यांनी भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलीय अशा मथळ्याखाली निनावी पत्र लिहण्यात आले आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रविषयी राजेंद्र पवारांना विचारले असता. ते म्हणाले, जेव्हा लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात. तसेच अनेक राजकीय जुन्या गोष्टी राजेंद्र पवारांनी सांगितल्या आहेत. जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आताची परिस्थिती निर्माण झाली असती असंही राजेंद्र पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed