जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, ‘म्हाडा, पुणे’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
Monsoon Tourism: पर्यटक! छे… नुसती बेशिस्त झुंड; वर्षासहलींच्या नावाखाली सह्याद्रीच्या कुशीतील पर्यटनस्थळी धुडगूस, कारवाई कधी होणार?
‘कृषी समृद्धी कर्ज योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवल्यास उत्पादनात ४० टक्के वाढ होईल. पाणीबचत आणि खतांचा वापर कमी होईल,’ असे पवार यांनी सांगितले.
PMPML CNG Buses: निधी तिजोरीत, बस कागदावरच; एक हजार सीएनजी बसपासून पुणेकर वंचित, प्रवाशांचे हाल कधी थांबणार?
‘दोन लाखांपुढील रक्कम भरल्यास कर्जमाफी’
‘लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले आहे. पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत दोन लाखापुढील थकीत रक्कम भरल्यास राज्य सरकार दोन लाख रुपये जमा करील ,’ अशी माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली.
६१,९०० —- कर्जमाफी मिळणारे जिल्ह्यातील शेतकरी
२ लाख रुपये —- प्रत्येकी मिळणारी कर्जमाफी
५२३ कोटी रुपये —- कर्जमाफीचे एकूण मूल्य
तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्येही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असून केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.
