• Sat. Jul 25th, 2026
    आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका

    Chandrakant Patil on NEET Paper Leak : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : भाजपचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ‘एक्स’ सोशल मीडियातून पाटलांवर टिकास्त्र सोडलं आहे.

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

    “एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना” असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

    काँग्रेसकडून टीका

    “चंद्रकांत पाटील, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो. पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्याचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार?” असा भावनिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत विचारला.

    “१५२ पेपरफुटी, कोट्यवधी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत… आणि तरीही हा विषय तुम्हाला “आंबा चोरी” इतका किरकोळ वाटतो? विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशी थट्टा करणाऱ्या व्यक्तीकडे राज्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय असणं, हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे.” अशा शब्दात सपकाळांनी नाराजी व्यक्त केली.
    Maharashtra TimesAshadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा; पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारणार, वारकऱ्यांना आषाढीची भेट

    मनसेकडून समाचार

    ‘आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते’ चंद्रकांत पाटलांचं अजब वक्तव्य. २० विद्यार्थ्यांचा मृत्यू यांना आंबा चोरल्यासारखं वाटतो?’ असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत पेजवरुन विचारण्यात आला आहे.

    Shiv sena UBT Protest | मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी! ठाकरेंच्या रणरागिणीचा रुद्रावतार

    ‘टीईटी गैरव्यवहार फडणवीसांच्या काळात’

    दुसरीकडे, ‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी घोटाळा उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात झाला नसून, २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना झाला होता. ठाकरे सरकारने हा घोटाळा उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई केली,’ असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी केला.
    Maharashtra TimesNarendra Modi : थँक्यू फ्रेण्ड्स! मोदींचा नवा ‘अँगल’, Gen Z चं लक्ष वेधलं, सलग दुसऱ्या रात्री इन्स्टा व्हिडिओ, 24 तासात 10 लाख फॉलोअर्स वाढले
    फडणवीस यांनी टीईटी घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना अंधारे म्हणाल्या, ‘टीईटी परीक्षा प्रक्रियेचे कंत्राट फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४ ते १९) दिले. ठाकरे सरकारने पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक केली. मात्र, त्यानंतर त्यापैकी काहींना सत्ताधारी पक्षात प्रवेश देण्यात आला.’