सातारा : खटाव- माणच्या दुष्काळी भागात जिहे कटापूरचे पाणी जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, असा संकल्प करून जयकुमार गोरेंनी आपलं स्वप्न पूर्ण करून माणच्या जनतेला जिहे कटापूरचे पाणी आणून दाखवले. त्यामुळे माणच्या जनतेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांना चांदीचा फेटा घालून त्यांना पुन्हा एकदा मानाचा फेटा बांधला आहे. मात्र, याच जाहीर कार्यक्रमात पुन्हा एकदा आमदार जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा करत जोवर माण -खटावच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचणार नाही, तोवर विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका मांडत एक नवा संकल्प माणच्या जनतेसमोर केला आहे .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला प्रतिसाद देत ऑगस्टमध्ये मीच या पाण्याचे पूजन करायला माण तालुक्यात येईल, असेही आश्वासन जयकुमार गोरे यांना व माणच्या जनतेला दिले आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार राहूल कूल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Read Latest Maharashtra News And Marathi Newsयावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक दशके जी भूमी थेंबथेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे. जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय. त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही फडणवीस म्हणाले.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आजचा दिवस माण, खटावच्या मातीसाठी माता-भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुष्काळी भाग म्हणून लागलेला कलंक पुसण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. सुरुवातीस या योजनेत या भागाचा समावेश नव्हता, तो व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सुधारित मान्यता दिली. औंधसह वीस गावांना पाण्याचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झाले पाहिजे, असा आग्रही त्यांनी यावेळी धरला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला प्रतिसाद देत ऑगस्टमध्ये मीच या पाण्याचे पूजन करायला माण तालुक्यात येईल, असेही आश्वासन जयकुमार गोरे यांना व माणच्या जनतेला दिले आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापूर) चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार राहूल कूल यांची प्रमुख उपस्थिती होती.
Read Latest Maharashtra News And Marathi Newsयावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक दशके जी भूमी थेंबथेंब पाण्यासाठी व्याकुळ झाली होती, त्या भूमीत जलपूजन करण्याची संधी आज आपल्याला मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. या भागात पाणी यावे यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी अथक परिश्रम आणि मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षाला आज चांगले फळ आले आहे. आपण विदर्भातून असल्याने दुष्काळी जनतेला ज्या यातना भोगाव्या लागतात त्याची जाणीव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या सर्व भागातील दुष्काळ संपविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पाणी योजना गतीने पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते याचे या रूपाने फार मोठे मॉडेल तयार झाले आहे. जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्यास आपण सुरुवात केलीय. त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो असेही फडणवीस म्हणाले.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आजचा दिवस माण, खटावच्या मातीसाठी माता-भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुष्काळी भाग म्हणून लागलेला कलंक पुसण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे. सुरुवातीस या योजनेत या भागाचा समावेश नव्हता, तो व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सुधारित मान्यता दिली. औंधसह वीस गावांना पाण्याचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झाले पाहिजे, असा आग्रही त्यांनी यावेळी धरला.